मी एक संभ्रमीत – प्रवीण दवणे

राजकारण असो की समाजकारण, साहित्य असो की सांस्कृतिक वातावरण पदोपदी संभ्रमाचे भोवरे आहेत, चकव्यात हरवावे आणि आपल्याच घराचा रस्ता आपल्याला सापडू नये असे बेसुमार वातावरण आहे. सामान्य माणूस म्हणून आजच्या वर्तमानाचे फक्त काही संभ्रम मांडण्याचा हा प्रयत्न. घटना प्रातिनिधिक आहेत, याला समांतर असंख्य घटना घडतच आहेत. लिहिणार किती नि सांगणार कोणाला?  आणि कोणाकोणाला? कुंपणच शेत खातंय, आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय, हे बालपणी मराठी पुस्तकात वाचलेले म्हणी व वाक्प्रचार आपण सत्यात जगत आहोत.

पुढे वाचा

संवाद साधनांद्वारे किती होतोय खराखुरा संवाद?

‘मेरे पिया गये है रंगून, किया है वहां से टेलिफुन; तुम्हारी याद सताती है, जीया मे आग लगाती है…’ हे प्रचंड गाजलेलं गीत आहे! 1949 साली आलेल्या ’पतंगा’ या चित्रपटासाठी प्रसिद्ध गायिका शमशाद यांनी गायलेलं. कोणत्याही कलाकृतीवर तत्कालीन समाजाच्या विचारसरणीचा प्रभाव असतो हे विचारात घेऊन हे गीत ऐकल्यास लक्षात येते की त्या काळी समाजाला टेलिफोनचे किती प्रचंड कौतुक होते! दूरवरच्या जीवलगाला टेलीफोनवर बोलता येणे ही बाबच मुळी प्रचंड कुतुहलाची आणि कौतुकाची! शमशाद बेगमच्या आवाजातून हा भाव खूप सुंदररित्या व्यक्तही झाला आहे.

पुढे वाचा

धोका प्रतिक्रियावाद्यांचा!

मध्यंतरी व्हॉट्स ऍपला एक विनोद आला. एकदा एक परदेशी कुत्रा भारतात आला. देशी कुत्र्यांनी त्याला विचारलं, ‘‘मित्रा, तुमच्याकडे कशाची कमतरता होती, ज्यामुळं तू इथं आलास?’’ तो म्हणाला, ‘‘आमच्याकडं राहणीमान, वातावरण, खाणंपिणं, जीवनाचा स्तर सगळं इथल्यापेक्षा कैक पटीनं झकासच आहे…. पण भुंकण्याचं जे स्वातंत्र्य भारतात आहे तसलं स्वातंत्र्य जगात कुठंही नाही…!’’

पुढे वाचा