शेतीबाडी | Shetibadi
₹60.00 Regular Price
₹45.00Sale Price
माणसाला जगण्यासाठी अन्न लागतं. हे अन्न शेतकरी पिकवतो. मात्र दुर्दैवानं जगाला जगवणारा हा शेतकरीच कायम संकटात असतो. कधी निसर्गाची अवकृपा तरी कधी राज्यकर्त्यांचे उदासीन धोरण. ज्या राष्ट्रात श्रमापेक्षा आणखी कशालाही अधिक किंमत मिळते ते राष्ट्र बेचिराख झालेच म्हणून समजा. आपण आता त्याच रस्त्यावर आहोत. शेती आणि शेतकरी जगावा यासाठी कोणीही काहीही करत नाही. दलालधार्जिण्या वृत्तीचे राजकारणी शेतकर्यांना कायम नागवत आहेत. या सर्वाचा अष्टाक्षरी कवितेच्या माध्यमातून वेध घेतलाय कवी माधव गिर यांनी.
- 64
.jpg)