top of page
विशेष लेख
शोध शिक्षणाचा : प्रस्तावना - डॉ. ह. ना. जगताप, सोलापूर
भारतात जे काही शिक्षणतज्ज्ञ होऊन गेले त्यामध्ये जे. कृष्णमूर्ती यांचे नाव एक विचारवंत शिक्षणतज्ज्ञ म्हणून घ्यावे लागते. त्यांचे शिक्षणविषयक विचार समजून घेताना त्यांचे जीवनविषयक तत्त्वज्ञान देखील समजून घ्यावे लागते. शिक्षणक्षेत्रात गेली 40-50 वर्षे काम करताना माझ्या एक गोष्ट लक्षात आली आहे की, आमच्यापैकी फार थोड्या लोकांना जे. कृष्णमूर्ती समजले आहेत. त्याचे एक कारण म्हणजे त्यांच्या तत्त्वज्ञानासंबंधीचे ग्रंथ मराठीतून फारसे उपलब्ध नाहीत. तसेच त्यांचे तत्त्वज्ञान हे केवळ सहज वा
Mar 11, 20243 min read
कष्ट-त्याग-समर्पणाची गाथा- 'अग्निदिव्य'
एका स्त्रीचा स्वतःच्या अस्तित्वासाठी व स्वतःच्या मुलाला हक्क व न्याय मिळवून देण्यासाठी दिलेला हा लढा, एक संघर्ष म्हणजेच हे पुस्तक. हे पुस्तक वाचताना एका स्त्रीचा लढा केवळ 'अग्नितांडव' न राहता तो 'अग्निदिव्य' कसा बनत गेला, याची प्रचिती हेते. कारण पुस्तकाच्या या नावातच या पुस्तकाचा सर्व गाभा दडलेला आहे. एका मुलाची आंतरिक वेदना, एका महिलेचा आभाळाएवढा संघर्ष व समाजमन असे तीन टप्पे युवालेखक आशिष निनगुरकर यांच्या 'अग्निदिव्य' या चरित्रात्मक पुस्तकात आहेत. एका महिलेने व तिच्या मुलान
Mar 11, 20243 min read
देह निरांजन झाला - माधव गिर
तापी दुथडी भरून वाहत नसली तरी दोन्ही किनाऱ्याच्या मधोमध एक मोठी धार वाहत झेपावत पुढे निघाली होती. आज तिच्या काठावर अभंगाचे सूर उमटले. टाळ-मृदुंगाचा नाद घुमला. हरिनामाचा गजर झाला. हिरव्या कंच वनराईत भगव्या पताका डोलू लागल्या. आळंदीहून निघालेला वैष्णवांचा मेळा तापीच्या किनाऱ्यावर विसावला. हे पाहून तापीचा प्रवाह आनंदला! संत जनांची मांदियाळी पाहून त्या प्रवाहाचे डोळे भरून पावले. तो दिवस, हो तोच दिवस, तापी आजपावेतो कधीही विसरली नाही. विसरणारही नाही. तो दिवस होता - ‘वैशाख मासातील
Mar 8, 20246 min read
ना देवी, ना दासी - - हिरालाल पगडाल, संगमनेर
लाखो वर्षाच्या मानवी इतिहासाच्या वाटचालीत एक बाब स्पष्टपणे दिसून येते ती म्हणजे जगातील बहुसंख्य संस्कृतींनी स्त्रीच्या महात्म्याला दगडाच्या, मातीच्या, धातूच्या मूर्तीत बंद करून देवळात कोंडून ठेवले आहे. वास्तव जीवनात मात्र स्त्रीच्या वाट्याला पुरुषांच्या तुलनेत दुय्यम स्थान दिले आहे. तिचे जिणे पुरुषांच्या तुलनेत कष्टदायी आणि विनासन्मानाचे आहे. प्राचीन काळापासून भारतात स्त्री देवतेची पूजा केली जाते. तिला मातृत्वाची देवता, शक्तिची देवता म्हणून मान्यता आहे. भारतातील सर्वच राज्या
Mar 8, 20248 min read


आणखी किती काळ लढावे लागणार? - संदीप वाकचौरे
जगाच्या पाठीवर महिलांवर अन्याय, अत्याचार होत होते. त्यांना माणूस म्हणून पुरूषांच्या बरोबरीच्या अधिकारापासून वंचित ठेवले जात होते. आज आपण समता आणि समानतेचा विचार करत आहोत. महिलाना समान अधिकार द्यायला हवे, अशी भाषा होत असली तरी २१ व्या शतकातही त्यांना पुरूषांच्या बरोबरीने वागवले जात नाही हेही वास्तव लक्षात घ्यायला हवे. आपल्याही देशात महिला अजूनही समतेच्या अधिकारासाठी लढा देत आहेत. महिलांना आज जे काही जगात समान अधिकार मिळत आहेत त्यासाठी जगातील महिलांना मोठा संघर्ष करावा लागला
Mar 8, 20248 min read


पेट्रोलपंप चालविण्याची बालपणीची ‘मनीषा’ झाली पूर्ण, व्यवस्थापक ते कर्मचारी सर्व महिलाच
संगमेश्वर हे मूळ गाव असलेल्या मनीषा रहाटे यांचे घराणे व्यावसायिक. त्यांनी सिव्हिल इंजिनिअर हे शिक्षण घेतले. काही काळ त्यांनी बांधकाम व्यवसायात कंत्राटे घेणे आणि त्यानंतर पंतप्रधान ग्रामसडक योजनेत अभियंता म्हणून स्वतःच्या नावाचा वेगळा ठसा उ मटवला; मात्र घराण्याची व्यावसायिक परंपरा पाहता त्यांचे मन सरकारी नोकरीत रमत नव्हते. याच दरम्यान भारत पेट्रोलियम या कंपनीची मुंबई-गोवा महामार्गावर खेड तालुक्यात खास महिलांसाठी पेट्रोलपंपाची जाहिरात निघाली. ही जाहिरात मनीषा यांचे वडील गणपत रह
Mar 8, 20243 min read
बाई आणि बदलणारे जग - मृणालिनी कानिटकर - जोशी
एक काळ असा होता की, स्त्री अनेक प्रकारच्या सामाजिक, कौटुंबिक जाचाच्या शृंखलांनी बद्ध होती. तिला ह्या जाचातून मुक्त करण्यासाठी त्याकाळी अनेक समाजसुधारक, विचारवंत हळूहळू पुढे येऊ लागले. ह्या शृंखलांचे वेढे सैल करण्याचा प्रयत्न करू लागले पण त्यांना कितीही वाटत असलं तरी परंपरावादी, जुनाट मानसिकता असणाऱ्या समाजाचा विरोध पत्करून क्षणार्धात ह्या शृंखला तोडणं शक्य नव्हतं. त्यामुळे धिम्या गतीने पण निश्चितपणे ह्या दिशेने समाजाची वाटचाल सुरू झाली होती. सर्व नाही तरी काही स्त्रिया पुढे य
Mar 8, 20243 min read


स्वकर्तुत्वाने सन्मान मिळवताना - शिरीष चिटणीस
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी आपल्या लिखाणात म्हटलेय, “माझ्या अगोदरचा कृष्णा म्हणून माझा भाऊ सहा महिन्यांचा असताना आईच्या अंगाखाली चिरडून झोपेत कधी मेला ते कळलेच नाही. त्याला पाजीत असताना आईला गाढ झोप लागून मुलाचा दम कोंडून सकाळी तो मेलेला आढळला! मग त्या एकांताला आणि आईच्या हालाला कोण सीमा असणार!” हा प्रकार १८७०-७१ मधील! त्यांच्या आईला एकंदर वीस मुले झाली. (एक खंडीभर अशी म्हण आहे) त्यापैकी एकावेळी पाचाहून जास्त केव्हाच नव्हती. याचा अर्थ निदान १५ तरी मुलांचा शोक आईला करावा ल
Mar 8, 20246 min read


शरीर एक जादूगार - राजेंद्र देशपांडे, पुणे
वरील शीर्षक वाचून आपल्याला आश्चर्य वाटलं असेल पण ते खरं आहे. माणूस व त्याचं शरीर खरंच जादूगार आहे. फक्त माणसाचं शरीरच नाही, सर्व प्राणिमात्र, वनस्पती यांची रचना, स्वत: जिवंत राहण्याची त्यांची किमया हे सर्वच विलक्षण आहे. पृथ्वीवरील सर्व जीव याच जादूने जिवंत आहेत. आता ही जादू कोणती? तर सर्वात मोठी जादू निसर्ग करीत आहे ती म्हणजे त्याच्यासारखा दुसरा जीव तयार करणं! माणसाच्या बाबतीत उदाहरण द्यायचं झालं तर, माणसाचा जन्म व्हायच्या आधी, दोन जिवापासून जिवाची निर्मिती, 9 महिने त्याचे उद
Mar 4, 202411 min read


मराठी साहित्यातील स्त्री संतांचे योगदान - माधवी देवळाणकर
कुठल्याही प्रदेशाचा सांस्कृतिक व साहित्यिक इतिहास किंवा मागोवा घेताना त्या प्रदेशाचा भौगोलिक व राजकीय इतिहास बघणे महत्त्वाचे ठरते, असे मला वाटते. साहित्यावर त्या संस्कृतीचा, लोकजीवनाचा प्रभाव पडत असतो. साहित्य म्हणजे त्या प्रदेशातील समाजजीवनाचा आरसा असतो. त्यामुळे साहित्यात ह्या सर्वांचे पडसाद उमटणे हे अपरिहार्य असते. साहित्याचा अभ्यास करताना तेथील भौगोलिक व राजकीय घडामोडींचा अभ्यास करणे आवश्यक ठरते. महाराष्ट्राची भूमी ही संत भूमी आहे. इथल्या काळ्या मातीत अनेक मोलाचे संत जन्म
Mar 4, 20244 min read
मराठी जीवनभाषा व्हावी
मराठी भाषा गौरव दिन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी साजरा होईल. ‘नेमिची मग येतो पावसाळा’ या न्यायाने दिन साजरे होत राहतात. कधी भाषा संवर्धन पंधरवाडा, मराठी भाषा दिन, वाचन प्रेरणा दिन, दरवर्षी मराठी भाषेचा उत्सव म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने आयोजित केली जातात. यासारखे अनेक उपक्रम करत आपण मराठी भाषेच्या विकासाच्या दृष्टीने प्रयत्न करत असतोच. शासनही वेगवेगळे आदेश देऊन मराठी संवर्धन करण्याचा प्रयत्न करत आहे. मराठीत स्वाक्षरीची सक्ती आणि सर्व पत्रव्यवहार मराठीत करणे याबाबत सक
Feb 27, 202411 min read


रामो राजमणिः सदा विजयते.. -श्रीराम ग. पचिंद्रे
भव्य हिमालयाच्या पायथ्याशी घनदाट अरण्यात आपल्या ब्रह्मवीणेच्या सुरात ‘नारायण नारायण’ असं नामस्मरण करीत देवर्षी नारद मुक्त संचार करत होते. एकाएकी एका निर्दय दरडावणीने त्यांच्या अखंड नामस्मरणात खंड पडला. समोर एक क्रूर चेहर्याचा धिप्पाड दरोडेखोर हातात तळपता परशु घेऊन देवर्षींना मारण्याच्या आविर्भावात उभा होता. ‘‘थांब तिथंच. एक पाऊल जरी पुढं टाकलंस तरी तुझी खांडोळी करीन,’’ दरोडेखोरानं धमकी दिली. देवर्षींची मुद्रा शांतच. त्यांना भयाचा यत्किंचित स्पर्शही झालेला नसल्याचं जाणवत होतं
Feb 26, 202419 min read


कर्तव्यतत्पर प्रभू श्रीरामचंद्र
महर्षि वाल्मीकींच्या श्रीरामायण या सांस्कृतिक महाकाव्यातील प्रमुख व्यक्तिरेखा म्हणजे प्रभू श्रीराम! प्रभू श्रीराम हे हजारो वर्षांपासून आपल्या भारतभूमीतील श्रेष्ठ आराध्यदैवत बनले आहे. आपली वैदिक संस्कृती व पूर्णविकसित अध्यात्मशास्त्र कोणाला तरीच आराध्य कसे मानेल? आत्मसाक्षात्कारी ऋषीमुनी आणि संत योग्य आणि सर्वश्रेष्ठच गोष्ट निवडून समाजापुढे आदर्श म्हणून ठेवतात. मग सहजच प्रश्न पडेल की मानवी देहात अवतरलेले, मानवाच्या मर्यादेत जीवन व्यतीत केलेले श्रीराम देवत्वाला कसे पोहोचतात? हज
Feb 26, 202410 min read


भारतीय संगीताचा इतिहास
अग्निमीळे पुरोहितं यज्ञस्य देवं रत्वीजम | होतारं रत्नधातमम || अग्निः पूर्वेभिर्र्षिभिरीड्यो नूतनैरुत | स देवानेह वक्षति || - ऋग्वेद संपूर्ण जगात निरपवादपणे आद्य वाङ्मय, म्हणून मानला गेलेला आपल्या भरतभूमीत जन्माला आलेला, ऋग्वेद ! ऋग्वेदातील मंत्र म्हणण्याची, गाण्याची एक पद्धत शास्त्रमान्य आहे. ते मंत्र कसे गावेत, हे सांगीतले आहे, ते सामवेदात ! सृष्टीनिर्माता म्हणून आपण ब्रह्मदेवाला मानले आहे, याचाच आधार घेत, आपण स्वराचे मोठेपण अधोरेखित करतो, ते त्याला 'नादब्रह्म' म्हणत, याचे प
Feb 22, 202413 min read


प्रत्येक क्षणाची मजा घेतली - गौरव चाटी
भारतीय चित्रपटसृष्टीत, संगीत क्षेत्रात प्ले बॅक सिंगर आणि संगीतकार म्हणून काम करतोय. 25 जुलै 1994 रोजी जन्म झाला. वयाच्या 9व्या वर्षी माझ्या आईने माझ्यातील कलाकाराला ओळखले कारण रेडिओवर दुरून जरी एखादं गाणं ऐकु आलं तरीही ते कान देऊन ऐकायचो. त्यात तल्लीन होऊन जायचो. घरातले डब्बे, दरवाजे, टेबल जे मिळेल त्यावर मी ठेका धरत असे त्यामुळे आईने मला गाण्याच्या क्लासला घातले. जसजसं वय वाढत गेलं तसातसा माझा गाण्याचा अभ्यास आणि रूची वाढत गेली. इंजिनीअरिंगचं धावपळीचं शेड्युल सांभाळून मी रि
Feb 19, 20243 min read
आजि नवस हे फळले नवसी
प्रत्येक वयात आलेल्या मुलीच्या आई-वडिलांना चिंता लागते ते तिला सुयोग्य असं स्थळ व वर मिळण्याची. अर्थात माझ्याही आई-बाबांना हीच चिंता लागलेली होती. मी दत्त सांप्रदायिक प. पू. नाना महाराज तराणेकर यांची अनुग्रहित. माझे आजोबा नानांचे अधिकारी शिष्य. माझ्या आजोळी आमचे वंशपरंपरागत आलेले पेशवेकालीन राम मंदिर आणि नानांनी स्थापन केलेले दत्त मंदिर. वडिलांकडून प. पू. गोंदवलेकर महाराजांची उपासना. त्यामुळे लहानपणापासून संपूर्ण आयुष्य हे आध्यात्मिक उत्सवांमध्येच गेलेले. भजनाची नितांत आवड. आ
Feb 19, 20244 min read


मी आणि आई
‘मला मुलगी होणार, 15 ऑगस्टला होणार आणि मी तिला नृत्य शिकवणार!’’ मम्मी बोलत होती. आजी म्हणत होत्या, ‘‘अगं शोभा, आत्ता तुझी प्रकृती पाहता बाळाचा जन्म 15 ला नाही होणार...’’ पण मम्मी ठाम होती! आणि झालेही तसेच! मुलगी झाली, 15 ऑगस्टला झाली आणि फक्त शिक्षण नाही तर आयुष्यच नृत्यासाठी दिले गेले... इतकी ताकदीची इच्छाशक्ती होती माझ्या मम्मीची आणि ती मुलगी मी... संयोगिता... संयोगिता या नावामागेसुद्धा एक गोष्ट आहे. माझी मम्मी जेव्हा शाळेत होती तेव्हा मम्मीने हे नाव ऐकले होते आणि जेव्हा मी
Feb 15, 20245 min read


धक्का - संजय संत
आपल्याला आयुष्यात अनेक सुखद, दु:खद, चांगले, वाईट, हवेसे, नकोसे धक्के बसतच असतात. काही व्यक्तिगत असतात व काही सामाजिक व राजकीय असतात. सामाजिक व राजकीय हे आपल्याला जरी धक्के वाटत असले तरी ते बरेचसे पूर्वनियोजित कवा प्रयत्नपूर्वक असतात. हा एक डावपेचांचा भाग असतो. धकाधकीचे जीवन हा शब्द ‘धक्का’ यावरूनच आला असावा. मुंबईकरांना तर धक्का हा रोजच्या जीवनातला अविभाज्य घटक बनला आहे. मोकळ्या लोकल कवा बेस्ट बसमधून प्रवास करताना चुकल्यासारखेच होत असेल. धक्क्याला लागणे असाही एक वाक्प्रचा
Feb 13, 202427 min read


समाजभूषण : ह. भ. प शांताराम महाराज निम्हण
वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ गायक ह. भ. प शांताराम महाराज निम्हण यांचा आज (दि. 11) पुण्यात अमृतमहोत्सवी सोहळा संपन्न होतोय. त्यानिमित्त ‘चपराक प्रकाशन’ने ‘सुभावभजन’ हा गौरवग्रंथ प्रकाशित केला आहे. या ग्रंथाचे संपादक आणि प्रकाशक घनश्याम पाटील यांचा हा विशेष लेख. नमो सुभावभजन भाजना । भवेभकुंभ भजना । विश्वोद्भव भुवना । श्रीगुरुराया ॥ अशा मधुर आणि अर्थबोधी शब्दात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी ईशस्तवन केले आहे. यातील ‘सुभावभजन’ म्हणजे विशुद्ध भावाने केलेले भजन! विशुद्ध भाव निर्म
Feb 11, 20243 min read
अग्निदिव्य - एका आईची संघर्षगाथा
माझे सन्मित्र, अत्यंत गुणी आणि अनेकानेक विषयावर जबाबदारीनं लिहिणारे लेखक आशिष निनगुरकर यांचा दूरध्वनी आला. ‘पुण्यात आलोय, भेटायचं आहे’ असं त्यांनी सांगितलं. रंगपंचमीचा दिवस असल्यानं मी नेमका कार्यालयीन काम संपवून त्या दिवशी घरी लवकर गेलो होतो. मग त्यांना घरीच बोलावलं. आमच्या घरी त्यांच्यासोबत रमामावशी आणि अभिषेकदादा आले. सुरुवातीला आशिषजींचे स्नेही म्हणून ती त्यांच्याकडं पाहत होतो. त्यानंतर रमामावशी बोलू लागल्या आणि डोळ्यात अश्रुंचा पूर येऊ लागला. एक तर त्यांची बोलण्याची मराठ
Dec 31, 20234 min read
bottom of page
.jpg)




