top of page
साहित्य चपराक
फ्रॉइडचे मानसशास्त्र आणि मनाचे श्लोक
रामदास स्वामींच्या श्लोकांत आणि फ्रॉईडच्या तात्त्विक बैठकीत विश्लेषणात्मक फरक असला तरी दोघेही एकाच झाडाची मशागत करत आहेत, हे सत्य नाकारता येत नाही. अर्थात फ्राईड मनरुपी झाडाची मुळे कुठवर पसरली हे सांगतो तर समर्थ रामदास स्वामी त्या मुळांना अधिकाधिक तग धरून राहण्याचे सारतत्त्व देतात. मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे । मना बोलणे नीच सोशीत जावे । स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे । मना सर्व लोकांसि रे नीववावे ॥ मनाला धाडसी, धैर्यशील आणि विनम्र होण्याची शिकवण देताना समर्थ रामदास स्वामीं
Mar 31, 20216 min read
युवा शक्ती
'विवेकानंदांनी पटविले व्यायामाचे महत्त्व' या मथळ्याखाली दैनिक 'महाराष्ट्र टाइम्स'च्या शनिवार दि. १६ जानेवारी २०२१ च्या अंकात पुढील बातमी वाचली. 'स्वामी विवेकानंदांनी युवकांना सुदृढ मन आणि व्यायामाचे महत्त्व पटवून दिले; तसेच ध्यानधारणा आणि योग करण्याविषयी मार्गदर्शन केले. भारतभूमीची कीर्ती जगभर पसरवणारे योद्धा संन्यासी म्हणजे स्वामी विवेकानंद होते,' असे मत ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ. अनिल कुलकर्णी यांनी व्यक्त केले. आशा प्रतिष्ठान ट्रस्टच्या वतीने पूना नाईट हायस्कूल व जुनियर कॉले
Feb 26, 20216 min read
आसक्ती
आपण सगळे जाणतो की महाभारतात युधिष्ठिराने द्यूत नावाचा खेळ (जुगार) खेळताना द्रौपदीला पणाला लावलं होतं. दुर्योधनाने शकुनीच्या मदतीने द्रौपदी ला जिंकलं होतं. द्रौपदी दुर्योधनाची दासी झाली होती. युधिष्ठिर पहिल्यांदा स्वतः जवळचं धन द्यूतात पणाला लावून हरला. नंतर स्वतःचं राज्य त्यानं द्यूतात पणाला लावलं, ते ही तो हरला. त्या नंतर त्यानं स्वतःला पणाला लावलं आणि तो स्वतः दुर्योधनाचा दास झाला. त्यानंतर त्यानं स्वतःच्या भावांना पणाला लावलं. त्यांनाही तो द्यूतात हरला. त्याचे भाऊ दुर्योधन
Dec 30, 20209 min read
कुरुक्षेत्र
चपराक दिवाळी अंक 2020 अॅडव्होकेट परिणीती संझगिरीच्या युक्तिवादाने कोर्टात एकदम शांतता पसरली. सुमारे अर्धा तास तळमळून, अस्खलित, न अडखळता त्या जे बोलत होत्या त्यांच्या शब्दाशब्दागणिक प्रत्येकजण भावनिक होत होता. जजसाहेब तर चष्मा काढून ऐकतच राहिले. कुरूक्षेत्रावरच्या महाभारतातल्या धर्मयुद्धात अर्जुनाचे बाण जसे सपासप येऊन शत्रुपक्षाच्या हृदयात घुसत असतील तसा एक एक शब्द ऐकणार्याच्या मनाला लागत होता. अनेक स्त्रियांचे डोळे आपोआप भरून येत होते. एक वेगळाच खटला आज उभा राहिला होता.
Dec 23, 202012 min read
कोरोनोत्तर काळातील विज्ञान कथेच्या दिशा
चपराक दिवाळी अंक 2020 प्रास्ताविक : कोरोनोत्तर काळ हा साधारणपणे पहिल्या जनता कर्फ्यूपासून मानता येईल. कोरोनोत्तर काळ म्हणजे घरकोेंडीचा काळ. घरकोंडीनंतच्या या संक्रमण काळात मराठी विज्ञानकथा कोणत्या दिशेने जावी अथवा जाऊ शकते याचे काही दिग्दर्शन करता येते. कोरोनोत्तर काळातील विज्ञानकथेच्या दिशांचे सूचन करावयाचे असल्याने आजवरची मराठी विज्ञानकथा कशी आहे? तिची आशयसूत्रे काय आहेत? हा तपशील तसा फार महत्त्वाचा ठरत नाही. तिला पुढे कोणत्या वळणाने जायचे आहे? तिच्यासमोर कोणती नवी आव्हान
Dec 18, 202014 min read
जयाते कामधेनू माये!
प्रतिमा पूजन झाले. सगळे आपापल्या जागेवर बसले. सूत्रसंचालकाने भाषण करण्यासाठी माझे नाव पुकारले. मी प्रतिमेला नमस्कार केला आणि भाषण करण्यासाठी डायसकडे गेलो. सभोवार दृष्टी फिरवली. आता भाषणाला सुरूवात करणार इतक्यात हर्षदा उभी राहिली. "सर, काहीतरी वेगळं सांगा. गांधीजींचा जन्म, शिक्षण, आंदोलने, शिक्षा, मृत्यू. सगळं दरवर्षी ऐकून पाठ आहे आम्हाला." तिचा नूर पाहून आश्चर्य वगैरे बिलकुल वाटलं नाही, कारण तिचं म्हणणं शतश: खरं होतं. तरीही सातवीच्या मुलीने निडरपणे अशी मागणी करणं सुखावणार
Oct 25, 20204 min read
जागो मोहन प्यारे!
"एक मेसेज सध्या मोबाईलवर व्हायरल होतो आहे. "महानगरपालिकेचे लोक पन्नास वर्षांपेक्षा अधिक वयाच्या लोकाच्या कोविड टेस्ट घ्यायला आले तर फक्त नकार द्या. ते म्हणतील की हे अनिवार्य आहे. कायदेशीर आहे. सोसायटीचा वॉचमन 'सरकारी अधिकारी' अशी बतावणी केली की 'पॉश' दिसणाऱ्या माणसाला काहीही न विचारता, काहीही चौकशी न करता सोसायटीमध्ये प्रवेश देतो." एक माणूस घरी येतो आणि म्हणतो, "मला तुमचा फोटो आणि अंगठ्याचा ठसा हवा आहे. तो आयुष्यमान भारत या योजनेसाठी घ्यायचा आहे." त्याच्याकडे एक लॅपटॉप, बायो
Sep 30, 20209 min read
जगबुडी माया
सुमारे १३०० वर्षांपूर्वी संशोधकांना मेस्किकोमधील काबा शहरामध्ये एक प्रचंड चक्राकार खोदकाम केलेली एक शिळा सापडली. ही शिळा कोणी तयार केली याचा संशोधकांनी तेव्हापासून आत्तापर्यंत शोध घेतला पण काहीही हाती लागले नाही. बहुदा स्पॅनिश समुद्रडाकूंनी त्याच्यावर हल्ला करून त्यांना नेस्तनाबूत केले व त्याची सर्व संपत्ती खरवल्यासारखी लुटून नेली. सुमारे २५०० वर्षांपूर्वी ती संस्कृती नष्ट झाली. त्याची कारणेही समजू शकली नाहीत. शोधण्याच्या प्रयत्नात ती शाळा सापडली. त्या शिळेवरील खोदकाम अत्यंत
Sep 21, 20204 min read
अक्षरलेणीतून सजली अभिमानाची लेणी!
प्रत्येकाच्या जीवनात कुणाची कुणावर ना कुणावर श्रद्धा असते, निष्ठा असते, भक्ती असते आणि त्यातून अशा श्रद्धेय व्यक्तिंची अधिकाधिक माहिती मिळवून ती वाचकांपर्यंत, श्रोत्यांपर्यंत पोहोचविण्याचा ध्यास घेतलेल्या अनेक व्यक्ती आज समाजात आहेत. त्यापैकी एक व्यक्ती म्हणजे निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ! स्वातंत्र्यवीर सावरकर आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर ही भुजबळ यांची आराध्यदैवत आहेत असे म्हटले तर ते अतिशयोक्तीचे ठरू नये. या दोघांच्या जीवनकार्याचा लेखकाचा सखोल अभ्यास आहे. केवळ
Aug 27, 20205 min read
रंदागुली इमला
मारुतीच्या पारावर पाटील हसला की समोरच्या चार-पाच गल्लीत ऐकायला जात असे. त्याचं हसूच होतं तसं. तो खो-खो हसायचा. त्या हसण्यातसुद्धा एक प्रकारची जरब होती, धाक होता. उंचापुरं, धडधाकट शरीर त्याच्या हसण्याला साथ देत असे. अंगात पांढरा शुभ्र सदरा, तेवढेच पांढरेशुभ्र धोतर आणि पायात करकर आवाज करणारे जोडे अशा थाटात पाटील गावातुन चालू लागला की बाया-बापड्या घराच्या बाहेर पडायलाही घाबरत असत. आजही पाटील पारावर बसून खो-खो हसला तशी त्याच्याबरोबर बसलेली एक-दोन माणसंही हसली. नेमका त्याचवेळी गव
Aug 19, 20203 min read
21 व्या शतकातील दोन द्रष्टे
- अनिल किणीकर (चपराक दिवाळी विशेषांक 2013) एक स्टीव जॉब्झ हे कौटुंबीक असूनही कलंदर असं एक व्यक्तिमत्त्व होतं. स्टीव चर्चला नाकारत होता पण आयुष्याच्या एका टप्प्यावर त्याने झेन बुद्धिझमचा सखोल अभ्यास केला होता. एकेकाळी तो हिप्पी पंथाचा शिष्य होता आणि त्यावेळी तो हरिद्वारमध्ये मनसोक्त भटकत होता. 1970 च्या सुमारास विद्रोही संस्कृतितील स्टीव हा एक संतप्त तरूण (अँग्री यंग मॅन) होता. शुद्ध शाकाहार प्रेमी स्टीव कित्येक दिवस ऍपल आणि कॅरट (सफरचंद आणि गाजरं) खाऊन राहणारा स्टीव दरिद्री
Aug 12, 202015 min read
ध्येयगीत
देवभक्ती अन् देशभक्तीने समाजजीवन घडवू या यास्तव सारे एकमुखाने राष्ट्रमंत्र हा गर्जू या जय जय रघुवीर समर्थ ॥ (धृ.) ॥ भ्रष्टाचारे देश पोखरे, अत्याचारे देश बरबटे सामर्थ्यानिशी चला झुंजूया रामराज्य हे घडवू या जय जय रघुवीर समर्थ... (1) बिळे बुजविण्या घुसखोरांची समाजघातक दुष्ट शक्तींची बुभुःकारे नभ दुमदुमण्या पुन्हा प्रेरणा घेऊ या जय जय रघुवीर समर्थ... (2) दूर अयोध्या, दूर शरयू ती, समीप आमच्या जांब नंदिनी शुद्ध शुचिते आपण करूया अयोध्येसम जांब ही नगरी जय जय रघुवीर समर्थ... (3) समर
Jul 24, 20203 min read
आम्ही कविसंमेलनांची अपत्ये
जेव्हा कविता लिहायला लागले त्यावेळी म्हणजे साधारण 20 वर्षांपूर्वी सत्यकथेसारखी नियतकालिके बंद पडण्याच्या मार्गावर होती. चांगले, दर्जेदार दिवाळी अंक निघायचे परंतु त्यात केवळ प्रस्थापित कवींच्याच कवितांना जागा होती. त्यावेळी मला आठवतंय कुठल्याही दिवाळी अंकाचा कविता विभाग हा कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांपासून सुरू होऊन अरुणा ढेरे, किशोर पाठक यांच्या कवितांपर्यर्ंत येऊन थांबायचा. त्यांच्यानंतर कितीतरी नवीन कवी बरंवाईट लिहित आहेत याची दखलही या दिवाळी अंकांच्या संपादकांना नसायची. त्यामुळ
May 7, 20203 min read
सर्वार्थाने गुरू
विष्णू बाळकृष्ण ऊर्फ मधू कुलकर्णी म्हणजेच माझे वडील. आम्ही त्यांना मामा म्हणत असू. मराठीचे गाढे अभ्यासक, कथाकथन करायचे. उत्कृष्ट वक्तृत्व! ‘वळण’, ‘यात्रा’ ‘ते दहा दिवस’ असे तीन कथासंग्रह प्रकाशित. ललित साहित्यातील आकृती बंधाची जडण आणि घडण (फॉर्म) या विषयावर पी.एचडी. केली. नागपंचमीसाठी प्रसिद्ध असलेल्या 32 शिराळा या गावातील विश्वासराव नाईक महाविद्यालयातून प्राचार्य म्हणून 1984 साली स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि पुण्यामध्ये 23 मे 1995 रोजी प्राणज्योत मालवली. इस्लामपूर (जिल्हा
May 3, 20206 min read
तो सुवर्ण योग
मासिक साहित्य चपराक, सप्टेंबर 2018 एका थोर माणसाच्या आणि माझ्या नावात खूप साधर्म्य, ते म्हणजे ज्ञानप्रबोधिनीचे सर्वेसर्वा अप्पा आणि मी पण अप्पा! त्यांचे अप्पा हे नावही त्यांना ओळखणार्या माणसात प्रचलित आहे आणि मला ओळखणारे सर्वजण अप्पा म्हणूनच ओळखतात. ज्ञानप्रबोधिनी नुकतीच सुरु झाली होती. अप्पांनी काही मुलांना जाहिरातीद्वारे मुलाखतीस बोलविले आणि त्यामध्ये त्यांनी माझी निवड केली. त्यावेळी ज्ञानप्रबोधिनी एका दगडी दुमजली इमारतीत कार्यरत होती. तेथेच मुलांना शिकविले जाई. अप्पा
Apr 26, 20203 min read
स्वित्झरलँड : टॉप ऑफ युरोप आणि माऊंट टिटलीस
‘थॉमस कुक’ तर्फे आम्ही युरोप सहलीला निघालो होतो. आमच्या तारखा सारख्या बदलत होत्या. शेवटी 3 जुलैच्या ऐवजी 6 जुलै तारीख नक्की ठरली आणि एकदाची आमची तयारी सुरू झाली. सगळा जमानिमा करून निघालो तर कधी न होणारी इमराईट्सची फ्लाईट रद्द होऊन आम्हाला पुढची फ्लाईट पकडावी लागली. त्यामुळे दुबईमधल्या इमराईट्सच्याच आलीशान हॉटेलमध्ये मुक्काम करावा लागला. एवढ सगळं होऊन फायनली आम्ही सहा जण लंडनला पोहोचलो आणि आमच्या थॉमस कुक ग्रुपला जाऊन मिळालो. पंधरा दिवसांमध्ये दहा देश आम्ही पादाक्रांत करणार
Apr 25, 20207 min read
चिंता करितो विश्वाची...
मासिक साहित्य चपराक, डिसेंबर 2019 सज्जनगड... सोळाव्या शतकापासून ते आजतागायत प्रभू श्रीरामाच्या उपासनेत आकंठ बुडालेला हा गिरीदुर्ग. इथल्या प्रत्येक दगडात समर्थांचा आजही वास आहे. जगद्उद्धारासाठी स्वतः परमेश्वर जेव्हा भूतलावर वास्तव्य करु शकत नाही तेव्हा त्याची विचारधारा घेऊन प्रत्येक वेळी अशा विभूतींनी जन्म घेतला आहे, ज्यांनी समाज घडवला. माणसाला माणूस बनवण्याचे कार्य केले. समर्थ रामदास स्वामी हे त्याच विभूतींचे जनक म्हणले तर वावगे ठरणार नाही. जालना जिल्ह्यातील जांब गावी सूर्य
Dec 25, 20194 min read
प्राक्तन - प्रा. बी. एन. चौधरी यांची कथा
साहित्य चपराक दिवाळी विशेषांक 2019 बहारो फुल बरसाओ, मेरा महेबूब आया है... हे गाणं मंडपात वाजायला लागलं आणि सार्यांच्या नजरा प्रवेशद्वाराकडं वळल्या. अंगावर लाल रंगाची ओढणी आणि पिवळ्या रंगाचं नऊवारी भरजरी वस्त्र ल्यालेली नववधू मोठ्या डौलदार चालिनं एक एक पाऊल टाकत मंडपात प्रवेशकर्ती झाली. तिच्या खांद्यावर आपले हात ठेवत तिचा भावी पती आश्वस्त होत संयमानं तिच्या चालीशी स्वतःची चाल जुळवत तिच्या मागून चालत होता. त्यांच्या पुढं पाच-सहा चिमुरड्या हातात फुलांच्या परड्या घेवून आणि त्या
Dec 18, 201910 min read
आचार्य अत्रे यांचा शक्तिमान विनोद
साहित्य चपराक दिवाळी विशेषांक 2019 आचार्य अत्रे हा मराठी साहित्यातला एक चमत्कार होता. त्यांना ‘विनोदपीठाचे तिसरे शंकराचार्य’ म्हटले गेले असले तरी कोल्हटकर, गडकरी यांच्या विनोदाशी त्यांची तुलना होऊ शकत नाही. पूर्वसुरींचे ऋण त्यांनी घेतले होते, जरूर घेतले होते! पण ते त्या छायेत कायम राहिले नाहीत. याचे उत्तर अत्रे यांनीच दिले आहे. ते स्वतःला ‘जीवनाचा यात्रेकरू’ म्हणत असत. ही त्यांची यात्रा जशी आयुष्यभर संपन्न झाली तशी या दोघांना करता आलेली नाही. याचे कारण होते प्रकृतीभिन्नता.
Dec 17, 201911 min read
धोक्याच्या वळणावर लातूर पॅटर्न
साहित्य चपराक दिवाळी विशेषांक 2019 दहावी व बारावीच्या निकालासोबतच नीट, सीईटी परीक्षांच्या धर्तीवर राज्यात गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी चर्चिले जाणारे लातूर काही काळापासून शिक्षण क्षेत्रातील अनिष्ट प्रवृत्तीमुळे चर्चेत आले आहे. शेतरानात ऊस, सोयाबीन, तूर आणि गावात शिक्षण व शिकवण्या वगळता इथे कोणतेही पीक पिकत नाही. सततचा दुष्काळ व पाणीटंचाई, अवर्षणप्रवण परिस्थिती, नेहमीचीच गारपीट व दळणवळणाच्या सुविधांअभावी इथे उद्योग व्यवसाय चालू शकत नाहीत. त्यामुळे साखर कारखानदारी, डाळ व तेलबिया प
Dec 17, 20197 min read
bottom of page
.jpg)




