top of page
साहित्य चपराक
अपराध
कमल आणि विभावरी दोघी सख्या बहिणी. कमल मोठी, फारशी शिकली नाही. कॉलेजला शिकायला गेली आणि एका माणसाच्या प्रेमात पडली. विभावरी खूप हुशार. अभ्यासात, खेळात, दिसायलाही खूप सुंदर. देवाने सारं उजवं माप विभाला दिलेलं. तिचं सतत कौतुक व्हायचं. कमल मात्र अगदीच कपाळ करंटी. ऐन शिकायच्या वयात प्रेमात पडली. ज्या माणसाच्या प्रेमात पडली तो साधा मेकॅनिक. आईला वाटायचं कमलने शिकावं; पण कमल ऐकायला तयार नव्हती. घरी या दोघींशिवाय फक्त आई. वडिलांचं छत्र लहानपणीच हरवलेलं. आईनं खूप कष्टानं या दोघींना
Aug 28, 201912 min read
दखलपात्र : वाचनीय अग्रलेखसंग्रह
माझ्या 'दखलपात्र' या अग्रलेख संग्रहाच्या दोन आवृत्या संपल्या. अनेक वाचक या पुस्तकांवर अजूनही अभिप्राय कळवतात. या पुस्तकानं मला अनेकांच्या मनात आणि हृदयात स्थान दिलं. आज दैनिक 'पुण्य नगरी'च्या 'मी आणि माझं वाचन' या सदरात ज्येष्ठ लेखक श्री. दिलीप देशपांडे यांनी 'दखलपात्र'विषयी लिहिले आहे. दिलीप देशपांडे सर, 'पुण्य नगरी'चे संपादक श्रीकांत साबळे सर आणि पुरवणी संयोजक स्वप्नील कुलकर्णी यांचे आभार! - घनश्याम पाटील दखलपात्र : वाचनीय अग्रलेखसंग्रह घनश्याम पाटील यांचे ‘दखलपात्र’ हे पुस
Aug 26, 20193 min read
शब्दाविना बरेच काही...
शब्द हे भावना व्यक्त करण्याचे साधन आहे. प्रेम, माया, विश्वास, सुख, दु:ख, राग, आनंद, वैताग, विचार या मनातील भावना पुढच्या व्यक्तिपर्यंत बर्याचदा शब्दांच्या मार्फत पोहोचवल्या जातात. लेखक, कवी, विचारवंत, वक्ता यांचे तर शब्द हेच सामर्थ्य आहे. विश्व, ब्रह्म आहे तरीही प्रत्येक जण बोलत असतोच की शब्दाविनाही बरेच काही! अगदीच तान्ह्या बाळाला कुठे काही सांगता येते? आई मात्र सारे काही समजून जाते. तसंही स्वतःचे मुल कितीही जाणते असले तरीही लेकराच्या भावना समजायला किमान आईला तरी शब्दांच
Aug 5, 20193 min read
रंग जीवनाचे!
रंग आणि माणूस यांचं गहिरं नातं आहे. निसर्गात अनेकानेक रंग आहेत. प्रत्येकाचा रुबाब वेगळा, मोहकता वेगळी. मूळ रंग कितीही असोत पण एका रंगात दुसरा मिसळून जे मिश्रण बनतं ना त्याला तोड नाही. ढोबळ मानाने रंग दोनात विभागावे वाटतात. भडक रंग आणि फिकट रंग! भडक रंग डोळ्यात पटकन जातात पण सुखावतातच असं नाही. याउलट फिकट मंद रंग मनाला शांत करतात, खुणावतात, मोहवतात! त्यांची सुंदरता मनाला भुरळ घालते. तसंही रंग आणि भावना यांचं जवळचं नातं आहे. भडक लाल रंग डोळ्यात भरतो. जो शक्ती, युद्ध आणि धोका
Aug 5, 20192 min read
सु(संवाद)...
‘‘ए मूर्खा तुला काय कळतं की नाही, ठेव ते बाजूला!’’ ‘‘जरा म्हणून अक्कल नाही...’’ ‘‘ये म्हातार्या जरा ऐक की...’’ ‘‘चल हो बाहेर, सगळी वाट लावली...’’ ‘‘अरे नीट खा की, सगळं कपड्यावर सांडवलं की...’’ ‘‘चल उरक की लवकर...’’ दररोज सकाळी ऑफिसला जायची गडबड एका बाजूला चालू असताना खालच्या मजल्यावरच्या फ्लॅटमधून तावातावात चालू असलेली जुगलबंदी अगदी नको नको म्हणत असताना कानावर आदळत असते. आता या गोष्टीची इतकी सवय झालीय की एखाद्या दिवशी भांडणाचे आवाज आले नाही तर चुकल्या-चुकल्यासारखं वाटतं.
Aug 5, 20192 min read
पायी वारीचा इतिहास
महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये वारकरी संप्रदायाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ‘वारी’ हा वारकरी संप्रदायाचा आचार मार्ग आहे. समृद्ध परंपरा असलेली पंढरपूरची वारी वारकर्यांना पिढ्यान-पिढ्या आत्मिक समाधान देत आहे. कोणतेही निमंत्रण नसताना लाखो वारकरी ज्ञानेश्वर माऊली, तुकोबाराय यांच्या पालखीबरोबर पंढरपूरला जातात. आषाढी, कार्तिकी, चैत्री व माघी या वारीबरोबरच दर एकादशीला विठूरायाच्या दर्शनासाठी वारकरी जात असतो. वारकरी संत, वारकरी संप्रदाय यावर मोठ्या प्रमाणात संशोधन झाले आहे व यापुढेही
Aug 5, 20193 min read
आगीतून उठून फुफाट्यात!
आकुर्डीच्या कंपनीतील नोकरी मी सलग पाच वर्षे केली परंतु रोज 70-80 किलोमीटर मोटरसायकलचा प्रवास मला नंतर नंतर पाठदुखीने त्रस्त करू लागल्यामुळे मी पुण्यातल्या संगम पुलाजवळील एका पॅकेजिंग मशीन बनवणार्या कंपनीत 1994 च्या सप्टेंबरला रुजू झालो. चांगला दीड वर्ष म्हणजे 1996 पर्यंत मस्त रुळलो होतो. मस्त मजेत चालले होते सगळे. नुकताच कुठे माझा जम ह्या कंपनीत बसू लागला होता. कलकत्ता, दिल्ली, चंडीगड अशी महाराष्ट्रभर माझी फिरतीही चालू होती. 1996 ला मी एक जुनी फियाट गाडीही घेतली होती. ही गाड
Aug 5, 20194 min read
कस्तुरी गंध
कुमुदिनी काय जाणे परिमळ । भ्रमर सकळ भोगितसे ॥ संत तुकोबांच्या या अभंगाला लतादीदींनी किती सुमधुर स्वरात गायलं आहे. हा अभंग जाणिवेच्या एका वेगळ्या पातळीवर घेऊन जातो. गहिरा अर्थ सांगून जातो. खरेच, कमळाला कुठं ठाऊक असतो ना त्याच्या अंतरीचा परिमळ? त्याचा भोग तर भ्रमरच घेत असतो. आपलंही असंच होत काहीसं. स्वतःजवळ काय आहे हे बहुधा स्वतःलाच ठाऊक नसतं अन् त्याचा शोध घेण्याचा प्रयत्नही करत नाही. निबीड अरण्यामध्ये, तळपत्या उन्हात, हरीण मृगजळामागं सैरावैरा धावत राहतं. हा आभास आहे हे उमगत
Jul 27, 20192 min read
पत्र आणि पत्रावळ
आजच्या संगणक किंवा मोबाईलच्या युगात पत्रलेखन हा कालबाह्य पर्याय असावा. कोरा कागद, शाईचं पेन आणि मनाच्या झर्यातून वाहतं खळखळ पाणी. पांढर्या शुभ्र कागदावरचं ते टपोर्या मोत्यांसारखं अक्षर वाचताना समोरचा हरखून जाई कधीकाळी. मजकूराच्या इतकंच त्यातल्या वळणदार वा गिचमिड अक्षराला महत्त्व होतं पण आता मात्र गेले ते दिन गेले म्हणायची वेळ आलीये. मोबाईलच्या एका रिंगने समोरचा उपलब्ध होतो. काम, निरोप, व्यक्त होणं या संदर्भात जे जसं असेल तसं माणूस बोलतो, संपला विषय. भावनांना तसा थारा कमीच
Jul 27, 20192 min read
1984, सुरूच न होता संपलेली प्रेमकहाणी!
1984 ला लॉ कॉलेजमध्ये पहिल्या वर्षात शिकत होतो तेव्हाची ही गोष्ट. मी आणि माझा एक मित्र त्याच्या स्कूटरवरून एका गुरवारी लॉ कॉलेजवरून परत येता येता गरवारे कॉलेजवरून येत होतो. खंडूजी बाबा चौकातून पुढे गरवारे पुलावरून जात असताना, माझ्या मित्राला सायकलवरून चाललेली एक मुलगी खूप आवडली आणि तो मला म्हणाला ‘‘रव्या तिला आपण तिचे नाव विचारायचे का?’’ मी त्याला म्हणालो ‘‘कशाला उगाच गडबड करतो!’’ मला म्हणाला ‘‘मला ती फारच आवडली आहे,’’ असे म्हणून त्याने स्कूटर त्या मुलीच्या सायकलच्या जवळ नेल
Jul 27, 20194 min read
सुख आले माझ्या द्वारी!
पुण्यातील कर्वे रस्त्यावरील मृत्युंजयेश्वर मंदिरात भजनाच्या कार्यक्रमाला गेलेल्या मंगलाताई भजन संपल्यानंतर घरी निघाल्या. सोबतच्या मैत्रीणींनी थोडे थांबावयास सांगितले म्हणून बसल्या. आज मैत्रिणींची विशेष सभा असावी असा त्यांनी विचार केला. हो! आज विशेष सभा आयोजित केली होती. विषय होता घरातील ताणतणाव. मग एकीने प्रस्तावना केल्यावर प्रत्येकीने आपल्या घरात घडणार्या घटनांचे वर्णन सांगण्यास सुरुवात केली. घटनांचा केंद्रबिंदु, अर्थातच सूनबाई. मी किती चांगली आहे, मी किती कष्ट करुन मुलाला
Jul 27, 201913 min read
गंधांची अजब दुनिया
सुगंधाची अशी एक मोहक अगोचर दुनिया असते. या दुनियेला वेगवेगळ्या खिडक्या किंवा झरोके असतात. कधी सुगंध या झरोक्यातून प्रवेशतात तर कधी आपण सुगंधांकडे ओढले जातो. अगदी पुराण काळापासून सुवास किंवा अत्तराचे वेड माणसाला आहे. हे सुगंध माणसाला वेडं करतात. आपली पत जाऊ नये म्हणून थेंबभर अत्तरासाठी कुणा बादशहाने अत्तराने भरलेला अख्खा हौद खुला केला होता म्हणतात. उंची अत्तरे, सुगंधी द्रव्ये वापरणे हे त्या बादशहालाच शक्य होतं. आपण उगाच चिमुटभर कापूस कानात घालून फिरणारी माणसं! हल्ली तर स्प्रे
Jul 21, 20192 min read
चीनची सफर
2009 च्या ऑक्टोबरमध्ये मला चायनाला कंपनीच्या एका कामासाठी महिनाभरासाठी जाण्याचा योग आला होता. चिंदाव ह्या उत्तर चायनामधील शहरातील एका शैक्षणिक विद्यापीठाबरोबर करार करून काही विशिष्ट कौशल्य ह्या चायनीज मुलांना शिकवण्याचा हा करार होता. त्यानुसार 26 ऑक्टोबर 2009ला मी आणि माझे अजून दोन सहकारी मुंबईहून शांघाई आणि शांघाईहून ह्या चिंदावला गेलो होतो. शांघाई ते हुंदाव हा साधारण 2 तास विमानाचा प्रवास करून आम्ही हुंदाव विमानतळावर उतरलो तेव्हा रात्र होती. हुंदाव विमानतळावर तिकडचा अमेरिक
Jul 21, 20194 min read
सावळबाधा
तुला शब्दांत उतरवणं खरंच सोपं नाहीये. तुझ्या अदा, मुड्स, नजाकती, यामुळेच खूप मुलखावेगळा भासतोस! ...म्हणून कदाचित तू मनापासून भावतोस. तुझं रिमझिमनं... संततधार झरणं... बेदरकारपणे बरसणं सारं आवडतं... मात्र रौद्ररूप तेवढं खटकतं. गोकुळातल्या नटखट कान्हासारख्या खोड्या करतोस. लक्ष लोचणे तुझ्या बरसण्यासाठी जेव्हा आतुर असतात तेव्हा सार्यांना तरसवणं तुला भारी जमतं...! आमच्या हातात मात्र तुझ्या झरण्यासाठी झुरणं इतकंच उरतं. तू बरसतोस आणि तापलेल्या धरेला जणू सुखाच्या सरींनी शमवतोस. तुझ्
Jul 21, 20192 min read
समर्पण
एकदा संत कबीर महाराजांकडे एक युवक आला. त्यानं कबीरांना विचारलं, ‘‘महाराज विवाह करणं योग्य आहे की अयोग्य?’’ ते ऐकून न ऐकल्यासारखं करत कबीरांनी प्रथम त्या युवकाकडे दुर्लक्षच केलं! काही वेळाने युवकाने अधीर होऊन परत तोच प्रश्न विचारला. मात्र त्यावेळीही कबीरांनी काही उत्तर न देता आपल्या पत्नीला हाक मारली व म्हणाले, ‘‘अगं आतून जरा कंदील घेऊन ये.’’ तेव्हा युवकाला मोठं आश्चर्य वाटलं. न राहवून तो म्हणाला, ‘‘महाराज आता दिवसाढवळ्या कंदिलाची काय गरज आहे? एवढ्या उजेडात तर सगळं काही स्वच्छ
Jul 20, 20193 min read
संत नामदेवांच्या जीवनचरित्राचा वेध घेणारी प्रासादिक कादंबरी
रवीन्द्र भट यांची संत नामदेवांच्या जीवनचरित्राचा वेध घेणारी ‘घास घेई पांडुरंगा’ ही रसाळ व प्रासादिक शैलीतील सात्विक आनंद देणारी कादंबरी 1994 मध्ये प्रसिद्ध झाली. रवीन्द्र भट संस्कार शिबिराच्या निमित्ताने पंढरपूरात असताना संत नामदेव समाजोन्नती मंडळाचे कार्यकर्ते श्री प्र. द. निकते शिंपी समाजाच्या वतीने संत नामदेवांच्या चरित्रावर आधारित कादंबरी लिहावी अशी विनंती करतात. सायंकाळी धूपारतीच्या वेळी राऊळाच्या गाभार्यात रवीन्द्र भट यांच्या मनात या कादंबरीचे बीज रूजते. ‘इंद्रायणीकाठ
Jul 20, 20194 min read
लाखाची गोष्ट
मथळा वाचल्यानंतर याला लाखाची लॉटरी लागली की काय? असा प्रश्न वाचकांच्या मनात येण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर याने लाखाचे बारा हजार तर केले नाहीत ना, अशी शंका येण्याची शक्यता आहे पण त्या लाखाची ही गोष्ट नव्हे. मराठी मनाच्या बदललेल्या मानसिकतेची ही गोष्ट आहे. गेल्या काही वर्षात इंग्रजी शिक्षण आणि इंग्रजी शाळा यांचा पालकांच्या मनावर मोठा प्रभाव राहिल्याचे आपण पाहतो. शहरी भाग सोडा पण ग्रामीण भागात कष्टकर्यालासुद्धा आपला मुलगा जगाबरोबर राहिला पाहिजे. त्यासाठी इंग्रजी शाळेतच गेला
Jul 20, 20193 min read
निजात्मप्राप्ती साधावी!
बालपणापासूनच माझ्या घरात संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला रामरक्षा म्हणण्याची पद्धत होती. त्यातून मनाला एक वेगळ्या प्रकारची शांती मिळत असे. रोज कानी पडणार्या त्या सात्त्विक शब्दांमुळे वाणी शुद्ध होत असे. ही पद्धत वर्षानुवर्षे आमच्या घरात चालू होती. ही परंपरा टिकवण्याचे सारे श्रेय जाते ते माझ्या प. पू. आदरणीय गुरूवर्य आणि संत एकनाथ महाराज यांचे तेरावे वंशज श्री. रावसाहेब महाराज गोसावी यांना. नात्याने जरी ते माझे वडील असले तरी देखील ते मला नेहमीच माझ्या गुरूस्थानी आहेत. माझ
Jul 15, 20193 min read
सद्गुरू... सौख्याचा सागरू!
एखादं बाळ जन्माला आल्यावर जेव्हा त्याच्या पाठीत बळ येतं, तेव्हा ते पालथं पडतं. मग काही दिवसांनी त्याच्या हातात बळ आलं की ते रांगायला लागतं... आणि कालांतरानं त्या बाळाच्या पायात बळ येतं तेव्हा ते चालायला शिकतं. त्यावेळी ते बाळ आपलं पहिलं पाऊल आपल्या आईच्या साक्षीनं टाकतं! मग जसजसं बाळ मोठं होतं, तसतसं ते जास्तीत जास्त वेळ आपल्या आईच्या सानिध्यातच आपलं बालपण उपभोगत असतं. त्यावेळी त्या नकळत्या वयात त्याच्यावर संस्कार रुजले जातात. नंतर काही वर्षानं तो जगाच्या पाठीवर कुठंही गेला
Jul 15, 20195 min read
यशाची केमिस्ट्री शिकवणारे शिंदे गुरुजी
इसवी सन 2000 साली माझे बारावीचे शिक्षण पूर्ण झाले. बारावी हा करिअर आणि शैक्षणिक आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा टर्निंग पॉईंट असतो. बारावीच्या शिक्षणाला सुरुवात ही साधारणतः वयाच्या सोळाव्या वर्षी होते. आपण सोळावे वर्ष हे धोक्याचे वर्ष मानतो कारण हे वर्ष तारुण्याच्या प्रदार्पणाचे वर्ष मानले जाते. अशा तारुण्याच्या उंबरठ्यावर बारावीसारख्या महत्त्वाच्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांकडून चुका होऊ नयेत म्हणून गरज असते ती एका उत्तम मार्गदर्शकाची. अशाच एका मार्गदर्शक व्यक्तीसोबत माझा त
Jul 15, 20192 min read
bottom of page
.jpg)




