top of page

‌‘अधोगती का प्रगती?‌’

  • 48 minutes ago
  • 27 min read

साधारण एक-दोन वर्षे मी आणि बायको (वंदना) काही दिवस रोज एकाच विषयावर नियमितपणे चर्चा करायचो, की आपण आपलं धनकवडी येथील राहतं घर नव्हे वास्तू (गुरुसदन) विकून सहकारनगर भागात 2 किंवा 3 बेडरूमचा फ्लॅट घेऊ! त्याला कारणही तसेच होते. पूर्वाचे मंदारबरोबर लग्न होऊन ती तिच्या घरी बिबवेवाडीला राहायला गेली होती.  


अंदाजे 30-35 वर्षे फक्त आमच्या शेजारी राहणारी नव्हे तर आमची जिवाभावाची जोगळेकर आणि पटवर्धन ही दोन कुटुंबे तुळशीबागवाले कॉलनी, सहकारनगर नंबर 2 येथे वर्ष झाले राहायला गेले होते. तेव्हापासून मी बायकोच्या पाठीमागे नुसता धोषाच लावला होता की आपणही जाऊ सहकारनगर येथे राहायला! आम्हाला धनकवडी येथे अजिबात करमत नव्हते. बंगल्यांची सोसायटी असल्यामुळे गरज पडेल तेव्हा संवाद होत होता पण तोही थोडा विरळच.  विरंगुळा म्हणून तळजाईला रोज चालायला जाणे मात्र चालूच होते. अधुनमधून बावधनला ‌‘चपराक‌’च्या कार्यालयात जाणे होत असे परंतु धनकवडीहून हे अंतर फार असल्यामुळे माझे जाणे तसे अगदीच कमी झाले होते.


त्यात आताशा आम्हाला खूप एकटे पडल्याची भावना मनात सारखी दाटून येत होती. आम्हा दोघांची नुकतीच साठी उलटून गेल्यामुळे व माझ्या तब्येतीच्या तक्रारींमुळे मला फारशी दगदग होत नव्हती. त्यात धनकवडीत वाहतुकीचा बोजवारा उडाल्यामुळे बाहेर कुठेही जाण्यासाठी फारच दमछाक होत होती.


आमची अडचण एकच होती, की आम्ही दोघेही स्वेच्छानिवृत्ती घेऊन घरी बसलो होतो व जमेल तसे आपापले छंद, आवडी निवडी जपत होतो. त्यात मला तर मुळात काहीच अर्थार्जन नव्हते. एलआयसीची जेमतेम दरमहा रुपये 3200/- पेन्शन होती. वंदनाला दरमहा आमचे दोघांचे भागेल अशी पेन्शन मिळत होती. मुळात स्वेच्छानिवृत्ती घेतल्यापासून आम्ही आमच्या गरजा इतक्या कमी केल्या होत्या की आम्हाला महिन्याला 15 ते 20 हजार रुपये, अगदी औषधांच्या खर्चासहित व्यवस्थित पुरत होते.


या पार्श्वभूमीवर इच्छा असूनही सहकारनगर येथे नवीन फ्लॅट घेण्याच्या दृष्टीने आमचे आर्थिक गणित अगदीच तुटपुंजे होते.  नव्हे कुठल्याही विचाराने ते आमच्या आवाक्याच्या बाहेरचे होते. मला तर ते स्वप्नवतच वाटत होते परंतु माझ्या डोक्यातील नवीन फ्लॅटचे खूळ काही केल्या जात नव्हते. त्याला कारणेही तशीच वैयक्तिक, वैद्यकीय, भावनिक, व्यावहारिक, सामाजिक आणि प्रायोगिक होती. ते म्हणतात ना, तुमची इच्छा प्रबळ असेल तर मार्ग आपोआपच निघतात. त्यासाठी नुसते नशिबावर अवलंबून राहून चालत नाही हेही तितकेच खरे आहे! प्रयत्ने वाळूचे कण रगडीता, तेलही गळे, ही प्रचलित म्हण आमच्या बाबतीत अगदी तंतोतंत लागू पडली.


मुळात आमचे राहते घर नव्हे तर आमची अत्यंत लाडकी वास्तू म्हणजे आमचे ‌‘गुरुसदन‌’. माझे सासू-सासरे (वंदनाचे आई वडील) यांनी स्वकष्टाने आणि जिकीरीने अतिशय कठीण परिस्थितीवर मात करून बांधले होते. त्यांच्या वयाच्या साठीत त्यांनी, स्वाती सोसायटीमधील 2 गुंठ्याचा प्लॉट 1972 साली 999 वर्षाच्या भाडेकरारपट्ट्याने घेतला होता. त्यावर ढोरमेहनतीने चार खोल्यांचे अतिशय टुमदार असे घर बांधले होते. त्याच्या आजूबाजूला सुंदरशी बाग फुलवली होती. 1978 साली त्यांच्या आयुष्याचे हे स्वप्न पूर्ण झाले. त्यामध्ये त्यांची एकुलती एक मुलगी वंदनासोबत गुरुसदनात ते राहायला आले. त्यानंतर माझे आणि वंदनाचे 1987 साली लग्न झाले. काळाची गरज आणि आमच्यावरील जबाबदारीच्या जाणिवेने आम्ही ‌‘गुरुसदन‌’मध्येच आमचा संसार थाटला होता. (यामागेही फार मोठा इतिहास आहे, जो या लेखाचा विषय नाही म्हणून लिहित नाही.)  


आमच्या सुखी संसारात आमच्या कन्यारत्नाचे आगमन झाले आणि आमचे विश्वच बदलून गेले. पूर्वागमनामुळे हळूहळू आमची आर्थिक परिस्थिती सुधारत गेली. आम्ही जसे जमेल तसे गुरुसदनचा कायापालट करत गेलो. अगदी एकदा सोडून दोनदा गुरुसदनची वास्तुशांत केली होती. सर्व नातेवाईक, आप्तेष्ट, मित्रमंडळींचे आदरतिथ्य गुरुसदनने केले आहे.  आमच्या इतकीच गुरुसदन ही सर्वांच्या जिव्हाळ्याची वास्तू होती, हे मात्र तिचे खास वैशिष्ट्य होते. कधीही कोणाला गुरूसदनने परके मानले नाही. इतका तिच्यात सकारात्मकतेचा, आपलेपणाचा व जिव्हाळ्याचा भाव होता. येणाऱ्या प्रत्येकाला गुरूसदनमध्ये पाऊल ठेवले की एक प्रकारची सात्त्विक ऊर्जा जाणवायची. म्हणूनच तर ते आमचे सर्वांचे गुरुसदन होते.  


गुरुसदनच्या कणाकणात, क्षणाक्षणात, वातावरणात, झाडांच्या पानांत, पक्ष्यांच्या किलबिलाटात, फन्टूश ह्या आमच्या श्वानाच्या आठवणीत, अनेक मांजराचे हक्काच्या असलेल्या घरात, अनंत स्मृती जतन करून ठेवलेल्या आहेत की काही विचारू नका!  खूप साऱ्या अविस्मरणीय अशा क्षणांची सोनेरी खाण म्हणजे आमचे गुरुसदन. नियतीने जिव्हारी लागणारे घाव घालून, काळाच्या खलबत्त्यात कुटून सुद्धा, त्यातून तावून सुलाखून अलगद बाहेर काढलेलेही खूप प्रसंग आमच्या ह्या गुरुसदनने आणि आम्ही अनुभवले आहेत. गुरुसदनचे आणि आमचे काय, कसे, किती घट्ट ऋणानुबंध असतील ह्याचा विचारच न केलेला बरा! भावनांचा बांध फुटला तर प्रलय निश्चित आहे, त्यामुळेच त्याला आवरही घालावा लागतो, हे तुम्ही समजू शकता.


इतका वेळ मी गुरुसदनविषयी भूतकाळात बोलतो आहे, त्याचे कारणही तसेच आहे. अतिशय जड अंत:करणाने सांगावे लागते आहे की, तुळशीबागवाले कॉलनी सहकारनगर नंबर 2 येथील नवीन फ्लॅट घेण्यासाठीचे आर्थिक पाठबळ आमच्याकडे नसल्यामुळे व काळाची गरज म्हणून सरतेशेवटी आम्हाला आमची लाडकी आणि अतिशय प्रिय अशी ही वास्तू गुरूसदन विकावी लागली व त्या अर्थाजनातून नवीन फ्लॅट विकत घ्यावा लागला.


आमच्यासाठी हा अतिशय कठीण व जोखमीचा निर्णय होता. माझ्यासाठी तर होताच होता परंतु वंदनासाठीही, जिच्या आईबाबांची ही वास्तूच एकमेव आठवण होती. तिने अक्षरशः काळजावर दगड ठेऊन ‌‘गुरुसदन‌’ विकण्याचा निर्णय घेऊन मला नवीन फ्लॅट घेण्यासाठीची अनमोल अशी मदत केली आहे.  आम्ही दोघांनी अहोरात्र कष्ट करून आमची ही वास्तू जतन केली होती, तिच्यात आमच्या गरजेनुसार कायापालट केला होता. अर्थात, आमच्या वृद्धापकाळात लागणाऱ्या सर्व सुखसोयी सुद्धा करून घेतल्या होत्या परंतु एकाकीपणा, नसलेला शेजार, वृद्धापकाळाची लागलेली चाहूल आणि त्यानंतर येऊ घातलेल्या समस्या, इच्छा असूनही विरळ होत चाललेले आधाराचे हात आणि भविष्यात आमचे शरीर थकल्यानंतर न घेता येणाऱ्या घराच्या जपणुकीच्या व देखभालीच्या काळजीपोटी आम्हाला दिवसेंदिवस चिंताजनक वाटू लागली होती.


अर्थात ह्या निर्णयास येण्या अगोदरही पूर्वा, मंदार आणि मंदारच्या आईशी सविस्तर चर्चा करून विचारांचे आदानप्रदान करत होतो. भविष्यात येणाऱ्या परिस्थितीचे आकलन करत होतो.  त्यावर तोडगा कसा आणि काय काढायचा ह्यावर बराच खल आम्ही सर्व जण जवळजवळ एक दीड वर्ष करत होतो.


आमच्यासाठी गुरुसदन विकून नवीन फ्लॅट घेणे म्हणजे आपल्या स्वार्थासाठी पोटच्या पोराला पाण्यात पायाखाली टाकून स्वतःचा जीव वाचवल्यागत वाटत होते. (इथे मला माकडिणीची कथा आठवत होती). असो.


आम्हालाही पूर्वा हेच एकमेव अपत्य. आमची जी काही मिळकत आहे तिच्यावर तिचाच अधिकार आहे. तो सुद्धा आम्हाला आमच्या हयातीत तिला सुपूर्त करायचा होता. आमची तशी एक प्रांजळ भावना होती. इथे आमचा नटसम्राट तर होणार नाही याची खातरी केलेली होती कारण आमची पोरं खूपच सद्गुणी आहेत हे मात्र नक्की. आमच्या सदसद्विवेक बुद्धिचा आणि भावनांचा योग्य आदर करूनच जो काही असेल तो निर्णय घ्यायचा असे ठरवले होते. ह्यासाठी माझी बायको वंदना हिचा मला फार हेवा वाटतो. तिने गेले 37 वर्षे माझ्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला आहे आणि तो ह्या निर्णयातही कायम होता हे विशेष आहे.


आम्ही सर्व बाबींची पडताळणी करून पाहत होतो. काही मित्रमंडळी आणि नातेवाईकांशी चर्चा करत होतो. पहिल्यांदा आम्हाला संमिश्र प्रतिक्रिया येत होत्या. इतके सुंदर बैठे घर अथवा बंगला विकून फ्लॅट घेणे म्हणजे शुद्ध मूर्खपणा आहे,  इतपत आमच्यावर शेरेबाजी केली गेली होती. अर्थात ती आमच्यावरील प्रेमापोटी होती असे समजून आम्ही पुढे जात होतो. त्यातही मी काही जवळच्या लोकांशी घर घेण्याबाबत  विचारणा करत होतो परंतु बऱ्याच लोकांचे आर्थिक गणित जमून येत नव्हते.  


त्यात पूर्वा आणि मंदारने भविष्यात ‌‘गुरूसदन‌’ची काळजी घेण्यास असमर्थता व्यक्त केली होती. त्यामागे त्यांची कारणेही अगदी योग्यच होती. मुळात आपली भावनिक मोलाची वास्तू जरी असली तरी तिचे भौगोलिक स्थान त्यांच्यासाठी फारच अयोग्य होते आणि भविष्यात ते ह्या वास्तूचा कितपत वापर करू शकतील अशी शंका व्यक्त करत होते. उत्पन्नाचे साधन म्हणून जरी पाहिले तरी त्यांच्या दृष्टीने ते फारच जिकीरीचे आणि जोखीमीचे होते व त्यांच्या भविष्याच्या दृष्टीने ते बरोबरही होते.


हे सर्व एकाबाजूला चालू असताना पूर्वा आणि मंदारने सहकारनगर येथे 3 बेडरूमचा फ्लॅट बुक करून ठेवला होता, जो साधारण 2 वर्षांनी ताब्यात येणार होता. त्यामागे त्यांचे आर्थिक नियोजन होते व ते अगदी योग्यही होते परंतु नंतर तेही नियोजन थोडेसे बदलले गेले. तसे पाहिले तर राहता बंगला विकून फ्लॅटमध्ये राहायला जाणे म्हणजे प्रगतीकडून अधोगतीकडे जाण्यासारखे होते. अर्थात प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोन हा वेगळा असतो. अर्धा रिकामा ग्लास, त्याच्याकडे बघताना काही लोक अर्धा भरलेला आहे म्हणतात तर काही अर्धा रिकामा असे म्हणतात. असो.


सकारात्मक दृष्टीने पाहिले तर या जगात अशक्य असे काहीच नाही त्यामुळेच आमच्या इच्छाशक्तिमुळेच आम्ही हा अतिशय अवघड, जिकीरीचा, जोखमीचा व तितकाच संवेदनशील आणि भावनेने ओथंबून वाहणाऱ्या विचारांचा ताळमेळ घालून आमच्या मनाला पटणारा निर्णय घेतला होता. संवेदनशील माणसाच्या आयुष्यामध्ये जेव्हा निर्णय घ्यायची वेळ येते आणि तेव्हा तो खरोखरच न डगमगता निर्णय घेत असेल तर त्याच्यामागे नियती, त्याचे नशीब आणि परिवार अथवा कुटुंब नक्कीच उभे राहते हे आमच्या या अनुभवाने सिद्ध होते. मध्यंतरी मंदार आणि पूर्वाच्या संसारात थोडा कठीण काळ दारावर येऊन ठेपला होता. पोरांची सत्त्वपरीक्षाच पाहण्याचे नियतीने ठरवले होते. त्यांच्या आयुष्यात जी काही स्थित्यंतरे येत होती, ती पाहून आमचे मन थोडे विषण्ण होत होते. आमच्याही आयुष्यावर ज्याचा कितीही नाही म्हटले तरी परिणाम होत होता. शेवटी लग्न म्हणजे दोन परिवार एकत्र येऊन आपली सुख-दु:खे एकमेकांशी वाटत असतात. तसेच काहीसे आमच्याही बाबतीत घडत होते. आमच्या एकुलत्या एक मुलीच्या सांसारिक आयुष्यातील हा अजून एक अवघड टप्पा ती पार करताना आमच्याही जिवाची घालमेल होत होती. एकमेकांपासून दूर राहून काहीच करता येत नव्हते आणि तसे करणे शारीरिकदृष्टीने मनात असूनही शक्य होत नव्हते. आज त्यांना आधाराची गरज आहे, उद्या आपल्याला त्यांच्या आधाराची गरज भासणार आहे हे प्रकर्षाने जाणवत होते. नियती वयपरत्वे आता आमच्यातील सहनशक्तिचा अंत पाहत होती असे म्हणालो तर अतिशयोक्ती होणार नाही.


ह्या सर्व कठीण परिस्थितीत एक जमेची बाजू म्हणजे, पूर्वा आणि मंदारचे एकमेकांवरील प्रेम, विश्वास आणि त्यांची अनुभवातून आलेली परिपक्वता हे होय. नियतीच्या इतक्या निष्ठुर परिस्थितीतही ही पोरं एकमेकांच्या साथीत मजबूतपणे उभी होती आणि तीच त्यांच्या सुखी संसाराची कधीही न हलणारी एकदम मजबूत अशी पायाभरणी होती असे मला अगदी प्रामाणिकपणे जाणवले.


मंडळी, थोडे विषयांतर झाले असे तुम्हाला वाटले असेल परंतु तसे काही नाही. भावनांच्या ह्या विश्वाला अनंत कंगोरे असतात आणि हेच ते कंगोरे एक एक करून उलगडत जायचे असते, त्यालाच तर आपण आयुष्य म्हणतो. ‌‘दुःख सांगितल्याने कमी होते आणि सुख वाटल्याने वाढते‌’, असे म्हणतात म्हणूनच हा सगळा खटाटोप आहे. दुसऱ्याच्या अनुभवावरून आपण काही तरी घ्यायचे आणि त्यातून शिकायचे व आपले आयुष्य समृद्ध करायचे ह्यातच खरी गमंत आहे. म्हणूनच तर हा लेखप्रपंच!


तर त्याचे असे झाले, की सरते शेवटी सर्व बाबींचा उहापोह करून, जर-तरचा विचार करून, चांगल्या-वाईटाची चर्चा करून, हवे-नको त्याची सांगड घालून, भूतकाळाच्या अनुभवातून घडवलेल्या वर्तमानाचा विचार करत करत, भविष्याची तजवीज म्हणून केलेल्या चुकांची उजळणी करत, आपल्यातील दुर्गुणांचा अभ्यास करून, गुणांचा लेखाजोखा समोर ठेवत, आपल्यामधील कमकुवत बाजूंचा अथवा उणीवांचा आढावा घेत, कुटुंबातील सदस्यांच्या प्राबल्याचा विचार करत करत, तुझे नको, माझे नको असे म्हणत सर्व अहंकार आणि अतिविश्वासावर मात करत, स्वत:मधील सामर्थ्याचा व कौटुंबिक एकजुटीचा जो काही निर्णय होईल तो घ्यायचे ठरवले आणि तो जो काही येईल त्याची सर्वार्थाने अंमलबजावणी करायची हे नक्की करून आम्ही आमचे ‌‘गुरुसदन‌’ विकून आमच्यासाठी सहकारनगर येथे 2 बेडरूम फ्लॅट घ्यायचे ठरवले.


तसेच पूर्वा आणि मंदारनेही 3 बेडरूम फ्लॅटचा हट्ट बाजूला ठेवून त्यांनीही 2 बेडरूमचा फ्लॅट घेण्याचे निश्चित केले. अर्थात ह्याला एकच अतिशय महत्त्वाची बाजू आम्ही विचार केली होती, ती म्हणजे शक्यतो हे दोन्ही फ्लॅट शेजारी शेजारी हवेत.  म्हणजे भविष्यात आमच्या पोरांना मोठ्या घराची गरज भासली तर दोन्ही फ्लॅट एकत्र करता येऊ शकतील आणि आमच्या दोन्ही परिवारांना एकमेकांचा आधारही मिळेल.  एकमेकांसाठीचा आधार हीच तर ह्या सर्व निर्णय प्रक्रियेतील जमेची आणि उजवी बाजू होती असे म्हणालो तर वावगे ठरणार नाही. तसेच भविष्यात गरज पडली तर एक फ्लॅट भाड्याने देऊन त्यातून उत्पन्नाचे एक साधन म्हणूनही विचार करून ठेवला होता. पोरांच्या माहिती तंत्रज्ञान व्यवस्थेमधील नोकऱ्या असल्यामुळे अगदीच नाईलाज झाला तरचा हा उपाय योजला होता. वेळ काही सांगून येत नसते. त्यानुसार भविष्याची थोडी तजवीज केलेली केव्हाही बरी, हा मी माझ्या अभ्यासातून आणि अनुभवातून आलेला विचार प्रत्यक्षात आणला होता, एवढेच काय ते त्याचे महत्त्व.


एक सांगतो, नियती काही एवढीही वाईट नसते. आमच्या मनात गेले दीड-दोन वर्षे चाललेले द्वंद्व तिने पाहिले होते आणि तिनेच त्यावर उपाय शोधून ठेवलेला होता, फक्त तो आमच्यापर्यंत तिने तो पोहोचवला नव्हता म्हणा किंवा ती आमची सत्त्वपरीक्षा पाहत होती असे मला वाटते. मुलांच्या आयुष्याच्या दृष्टीने त्यांचा निर्णय अगदी योग्य होता परंतु आमच्या वयाचा विचार करता, निवृत्तीनंतर म्हणजे साठीनंतरच्या आयुष्यात पुन्हा परत एकदा सगळ्याच बाबतीत आम्हाला नव्याने सुरुवात करायला भाग पाडणारी ही सगळी प्रक्रिया होती. अगदी आधार कार्ड, पॅनकार्ड, बँकांचे व्यवहार, ड्रायव्हिंग लायसेन्स, गाडीच्या कागदपत्रांवरील, पासपोर्टवरील पत्ते इत्यादी, इत्यादी. ह्याचा नंतर शांतपणे विचार केल्यावर आपल्याला हे सगळे झेपेल का? आणि जमेल का? असे काही क्षण वाटले पण एकदा निर्णय घेतला की तो परत फिरवायचा नाही असा निर्धार केल्यामुळे गुरुसदनचा विरह सहन करावा लागला. तत्कालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी गुरुसदनचा त्याग करणे आमच्यासाठी खूप गरजेचे होते आणि ह्या प्रक्रियेमध्ये आपण निर्जीव समजत असलेल्या दगड, वाळू, सिमेंटच्या वास्तूनेही, सजीव होऊन आमच्या संकल्पास फार अनमोल अशी साथ दिली आहे, हे विसरलो तर ती कृतघ्नता होईल. आमच्या आयुष्यातील गुरुसदनचे भावनिक स्थान कदापि ढळणार नाही हे निश्चित आहे.


वर म्हटल्याप्रमाणे नियतीने साथ दिली आणि बहीण अश्विनीच्या ओळखीने आम्हाला सहकारनगरमध्ये नुकतेच बांधून तयार असलेले पाचव्या मजल्यावरील शेजारी शेजारी असलेले 2 बेडरूमचे 2 फ्लॅट बघायला मिळाले. नियतीने हे फ्लॅट आमच्यासाठीच तयार ठेवले होते की काय असे वाटले. अजिबात वेळ न दवडता आणि आधी केलेल्या सर्व चर्चा चर्वितचर्वणाचा परिपाक म्हणून एका रात्रीत आम्ही हे दोन्ही फ्लॅट विकत घेण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्याच दिवशी आम्ही विकसकाच्या कार्यालयात जाऊन आगाऊ रक्कम भरूनही आलो हे विशेष नमूद करतो आहे. विकसकाने आम्हाला उरलेले पैसे भरण्यासाठी फक्त 60 दिवसांची मुदत दिली होती, जी मला प्रथमतः फारच मुश्किल वाटली होती परंतु जीव तोडून प्रयत्न केला तर साध्य करणे अवघडही वाटत नव्हते. इथे माझ्या आत्मविश्वासाचा आणि आयुष्यातील चांगल्या-वाईट अनुभवाचा कस लागणार होता. जो की मला तारणार तरी होता किंवा मारणार तरी होता.  आयुष्याचा फार मोठा जुगार मी खेळतो आहे, ज्यात मला जिंकण्याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय नव्हता, हे इथे खास नमूद करावेसे वाटते. अशा वेळेस आपल्या श्रद्धास्थानास आठवावे, त्यापुढे नतमस्तक व्हावे. म्हणजे आपले सर्व प्रश्न चुटकीसरशी सुटतात हे नक्की. हो पण त्यासाठी आपण इमानदार असायला हवे बरं का!  


ह्या भावनेच्या खेळात माझी अवस्था चक्रव्यूहात अडकलेल्या अभिमन्यूसारखी झाली होती पण माझ्या मागे माझ्या पूर्वजांची पुण्याई, माझी नीतिमत्ता, सचोटी, प्रामाणिकता, कुटुंबाप्रतीची आस्था, प्रेम, गुरुसदनवरची निष्ठा आणि शंकर महाराज व स्वामी समर्थांचे आशीर्वाद होते, जे मला यशस्वी करण्यासाठी सज्ज होते व तसे त्यांनी केलेही. पूर्वा आणि मंदारसाठी कर्जाचा पर्याय उपलब्ध होता, त्यामुळे त्यांना त्यांच्या फ्लॅटसाठीचे पैसे उभे करण्यास फारशी अडचण नव्हती. प्रश्न माझा आणि वंदनाचा होता.  आता आमच्यासमोर गुरुसदन विकण्याशिवाय पर्यायच नव्हता आणि जो आम्ही फ्लॅट बुक करतानाच मनाशी पक्का विचार करून नंतरच आगाऊ रक्कम देऊन आलो होतो. तरीही आमच्या फ्लॅटची रक्कम खूपच मोठी होती. आयुष्याची सर्व कमाई आणि गुरुसदन विकून येणारी रक्कम एकत्र करून हे सगळे कसेबसे जमवायचे होते, ते कळत नव्हते. हीच तर खरी आमच्यासाठी तारेवरची कसरत होती. अगदी प्रांजळपणे सांगतो, सहकारनगरमध्ये फ्लॅट घेण्याचे स्वप्न पाहणारा मी जेव्हा विकसकाच्या कार्यालयात बसलो होतो आणि फ्लॅटच्या किमतीवरून चर्चा करत होतो तेव्हा थोडा हबकलोच होतो. फ्लॅटची किंमत ऐकून थोडा वेळ डगमगायला झाले पण मनाशी एक खूणगाठ बांधली होती की आता काही झाले तरी मागे हटायचे नाही. जे होईल ते पाहू. सरतेशेवटी शंकर महाराज आणि स्वामी समर्थ आहेतच की आपल्या पाठीशी! आणि खरंच महाराज आमच्या सदैव पाठीशी उभे होते ते पदोपदी जाणवत होते.


सर्वसाधारणपणे दोन बेडरूमचे दोन फ्लॅट सहकारनगरमध्ये आणि गुरुसदनची विक्री असे एकूण तीन व्यवहार केवळ 60 दिवसांत पार पाडायचे शिवधनुष्य आम्ही चौघांनी उचलले होते व ते अगदी आलेल्या सर्व अडचणींवर (त्याची यादी खूप मोठी आहे, त्यावर वेगळा लेख होईल) लीलया मात करून पेलवले होते हेही तितकेच खरे आहे.


मंडळी, विकसकाला आगाऊ रक्कम देऊन आल्यावर, गुरुसदनच्या विक्रीसाठी मित्र मंडळी, नातेवाईक वगैरेंशी चर्चा करताना एक जाणवले की गुरुसदनचा व्यवहार फारच मोठा होता आणि तो मला अपेक्षित असलेल्या किमतीत तसेच एका रक्कमेत पूर्ण करणाऱ्या गृहस्थाची (गिऱ्हाईक नाही म्हणणार) अथवा कुटुंबाची गरज होती. माझी तीच तर एकमेव अट होती. तसे मी स्वाती सोसायटीच्या चेअरमन यास सांगून ठेवले होते.  सोसायटीमधील दोन प्रथितयश सदस्यांशी सल्लामसलतही केलेली होती. काही बाबतीत आपल्याला जर फारसे ज्ञान व अनुभवही नसेल तर योग्य व्यक्तिचे मार्गदर्शन व सल्ला घेतलेला बरा, हे न सांगितलेले बरे! त्यांच्या सल्ल्याचा मला पुढे खूपच चांगला फायदा झाला हे मात्र नक्की.


गुरुसदन विकण्याच्या दृष्टीने माझी हालचाल सुरु झाली.  काही इस्टेट एजन्टपर्यंत ही बातमी गेली आणि रोज 3 ते 4 मंडळी घर बघायला येत होती. हा प्रवास जवळजवळ पुढील 40-45 दिवस न थकता चालू होता. माझ्या आयुष्यातील एवढ्या मोठ्या व्यवहाराची ही पहिलीच वेळ होती, जशी पहिल्या बाळंतपणात बाईची घाबरगुंडी उडते अगदी तशीच माझी गाळण उडाली होती. इतके विचित्र लोक घर पाहायला येत होते की काही विचारू नका. मी जर पु. ल. देशपांडे असतो तर त्यावर दोन तीन तरी कथा केल्या असत्या आणि पंधरा वीस व्यक्तिचित्रणे लिहिली असती.


एक तर आमचे गुरुसदन हे दोन मजली होते. त्यात घरात इतक्या सोयीसुविधा करून घेतल्या होत्या की त्या प्रत्येक वेळेस आलेल्या प्रत्येक गिऱ्हाईकास (इथे गिऱ्हाईक हाच शब्द योग्य आहे म्हणून वापरला आहे) पटवून देता देता माझी पुरती वाट लागत होती. घशाला कोरड पडत होती आणि जिने चढउतार करून पायाचे तुकडे पडत होते. त्यात रोज भावनांचा अक्षरशः चुराडा होत होता. येणारी गिऱ्हाईके एक बंगला म्हणून बघत होती आणि त्यांच्या कुवतीने त्याची किंमत करत होती. त्यात त्यांचे काहीच चुकत नव्हते पण हे सर्व हाताळताना माझ्या मात्र पोटात गोळाच यायचा. दरवेळेस मन खंबीर करून आलेल्या लोकांना आम्ही दोघे सामोरे कसे जात होतो, ते आमचे आम्हालाच माहीत.


सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की आम्ही सर्व फर्निचर सहीत गुरुसदन विकले आहे कारण माझ्यासमोर दुसरा पर्यायच नव्हता. साधारण 4 बेडरूमचे हे घर, त्यात भिंतीमधील कपाटे, 6 फुटांचे लाकडी बेड अगदी गादीसहित, जे फ्लॅटमध्ये मावणे शक्यच नव्हते आणि त्याला सामान ठेवायची सोय नसल्यामुळे ते तिथेच सोडून देणे मला योग्य वाटले. तसेच गुरुसदनला चांगली किंमत यावी ह्या उद्देशाने मी अक्वॉगार्ड, गॅसवरील चिमणी, पंखे, किचनमधील कपाटे इत्यादी हे सर्व त्या किमतीत वर्ग करत होतो. जेणेकरून मला सहकारनगरमधील फ्लॅट घेताना कुठलीही अडचण येऊ नये हा त्यामागील उद्देश होता हो.


माझ्या उभ्या आयुष्यात मी खूप मार्केटिंग केले होते परंतु स्वतःचे घर विकताना कराव्या लागलेल्या मार्केटिंगने माझ्या तोंडाला अक्षरशः फेस आणला होता. एवढी मेहनत करून जवळ जवळ 40 दिवस सकारात्मक असे काही घडतच नव्हते.  एजंटांचा नुसता सुळसुळाट होता. व्यवहाराची रक्कम मोठी असल्यामुळे त्यांचे अथक प्रयत्न माझा जीव मात्र मेटाकुटीला आणत होते. त्यात त्यांना दोष देण्यास काहीच अर्थ नव्हता. कारण घर योग्य किमतीस, लवकरात लवकर, योग्य कुटुंबास, विकणे ही माझी गरज जास्त महत्त्वाची होती.


जी काही माणसे अथवा कुटुंबे घर पाहायला येत होते, त्यांचा आम्हाला पहिला प्रश्न असायचा की, ‌‘तुम्ही एवढा चांगला आणि सुस्थितीतील बंगला कशासाठी विकता आहात?”  त्यांच्या ह्या प्रश्नाला काय उत्तर द्यावे हेच कळत नव्हते. “हे घर विकून आम्हाला सहकारनगर येथे 2 बेडरूमचा फ्लॅट घ्यायचा आहे” असे सांगितल्यावर तर काही जणांनी आम्हाला वेड्यातच काढले होते. अर्थात त्यात त्यांची काहीच चूक नव्हती. ते त्यांच्या जागी अगदी योग्य होते व आमच्याच बाजूने प्रांजळपणे विचार करत होते परंतु जेव्हा त्यांना नाण्याची दुसरी बाजू कळली, जी की आम्ही आणि आमची मुलगी दोघेही शेजारी शेजारी फ्लॅट घेणार आहोत म्हणून आम्ही हा बंगला विकून आमच्यासाठी एक फ्लॅट घेत आहोत व मुलगी आणि जावई कर्ज काढून त्यांच्यासाठी शेजारचा फ्लॅट घेणार आहेत! तेव्हा कुठे लोकांचा आमच्यावर विश्वास बसू लागला.


तरी ह्या व्यवहारात येणारी सर्वात मोठी अडचण म्हणजे, मी सांगितलेल्या किमतीला फारसे कोणी तयार होईनात. जवळ जवळ 15 एक जणांनी घर पाहूनही व्यवहार काही होत नव्हता.  पुढे जाणारा एक एक दिवस माझ्यासाठी हिमालयासारखा भासत होता कारण विकसकाने मला दोनच महिन्यांचा अवधी दिला होता. त्यातले 40 दिवस तर असेच काहीच न घडता फुकटात गेले होते. माझा तर संयम सुटत चालला होता. एक वेळ अशी आली होती की मी पोरांना सांगितले की, “तुम्ही तुमच्या फ्लॅटचा व्यवहार करून घ्या. आमचे आपण नंतर बघू. नाहीच जमले तर पुढे मागे जवळपास दुसऱ्या एखाद्या नवीन प्रकल्पात घेऊ आम्ही फ्लॅट.” हे बोलताना माझ्या काळजाला किती वेदना होत होत्या ते माझे मलाच माहीत. शब्द देऊन तो फिरवणारा हा शिवरायांचा मावळा नव्हे, असे मी सतत स्वत:ला समजावत होतो आणि आम्ही दोघे नवरा बायको येऊ घातलेल्या चांगल्या दिवसाची वाट पाहत होतो.


आमच्या जिवाची घालमेल, तळमळ, कळकळ आणि तगमग शंकर महाराज आणि स्वामी समर्थ देव्हाऱ्यातून पाहत होते आणि गालातल्या गालात हसत मनातल्या मनात म्हणत होते, कशी जिरवली एका माणसाची!  महाराज आमच्या ठाम निर्णयाची व त्या निर्णयामागील प्रामाणिक आणि निरागस भावनेची सत्त्वपरीक्षाच पाहत होते असे मला नंतर जाणवले.


आमचे गुरुसदन ह्या वास्तुवरील प्रेम नक्कीच निर्मळ व प्रांजळ होते व त्या वास्तूच्या आदरापोटीच आम्ही तिची पुढे आबाळ होऊ नये म्हणूनच योग्य व्यक्तिला सुपूर्त करून फार मोठ्या ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न करत होतो. हे त्यांना जाणवले व त्यानंतर त्यांनी आमच्या व्यवहारात येणारे सर्व अडथळे यथातथा दूर करून योग्य कुटुंबास आमच्या चेअरमनकरवी आमच्याकडे पाठवले.


मंडळी तुम्हाला आश्चर्य वाटेल आणि मी म्हणतो त्यावर विश्वासही बसेल. जोवर नियतीच्या मनात नसेल तर काहीच घडत नाही. तुमची श्रद्धा जर का स्वामींवर असेल आणि शंकर महाराजांवर असेल तर सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे घडतेच, फक्त तुम्हाला महाराजांच्या सत्त्वपरीक्षेत पास व्हावे लागते. मी शंकर महाराजांच्या मठात जाऊन आलो आणि माझ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मला मिळाले आणि आमच्या प्रांजळपणे पाहिलेल्या स्वप्नांची पूर्ती ही त्यांनीच घडवून आणली हे वेगळे सांगावयास नको.


50व्या दिवशी आमचा एका चांगल्या व योग्य कुटुंबाशी गुरुसदनचा व्यवहार झाला. कर्मधर्मसंयोगाने त्यांनी शब्द दिल्याप्रमाणे 8 दिवसांत संपूर्ण पैसे देऊन हा व्यवहार पूर्णही केला. चेअरमन साहेबांनी तर आमच्या व्यवहारात जातीने लक्ष घालून तो सर्व कागदपत्रांनिशी पूर्णही करून घेतला. हा व्यवहार पूर्ण झाल्यावर आम्ही बरोबर 60व्या दिवशी आमच्या विकसकास त्यांच्याशी ठरलेल्या रकमेचा व्यवहार पूर्ण करून एका महिन्यात आमच्या फ्लॅटचा ताबाही घेतला. पूर्वा आणि मंदारनेही त्यांच्या कर्जाचे सर्व सोपस्कार पूर्ण करून त्यांचाही व्यवहार पूर्ण करून फ्लॅटचा अंतर्गत सजावटीसाठीचा ताबाही घेतला.


आमच्या नवीन फ्लॅटचे अंतर्गत सजावटीचे काम जोगळेकरांच्या अमृताच्या कल्पकतेने आमच्या अपेक्षेच्याही पलीकडचे साकारले होते. त्यामुळे आमचा नवीन घरात राहायला येण्याचा उत्साह वाढण्यास मदत झाली हे नक्की. योगायोगाने माझे आराध्य दैवत गणपती बाप्पा यांचा गणेशोत्सव होता. त्यानिमित्ताने आम्ही नवीन फ्लॅटमध्ये सर्वप्रथम गणेशोत्सवात श्री गणेशाची मनोभावे प्राणप्रतिष्ठा केली. अर्थात आम्हाला विकसकाकडून राहण्यासाठीचा फ्लॅटचा ताबा मिळायला अजून महिनाभराचा अवधी लागणार होता. त्यात आम्हाला गुरुसदनचा ताबा द्यायचा होता. ह्या महिनाभरासाठी कुठे राहायचे आणि सामान कुठे ठेवायचे असा गहन प्रश्न समोर उभा ठाकला होता. प्रश्नातच त्याचे उत्तर दडलेले असते, आपण सचोटीने ते शोधायचे असते. महाराजांनी माझा मित्र नव्हे मोठा बंधू जयकुमार काकडे आणि त्याच्या परिवाराला ह्या प्रश्नाचे उत्तर म्हणून आमच्या मदतीला पाठविले होते.


आमचे सर्व सामान आम्ही पूर्वा-मंदारच्या फ्लॅटवर ठेवले आणि गुरुसदनचा ताबा देऊन काकडे काकांकडे जवळ जवळ दीड महिना अगदी हक्काने राहिलो. काकडे वहिनी आणि सून अल्पनाने आमची खूप काळजी घेतली. भरपूर जेवू खाऊ घातले. त्यात काकाच्या नातीने अवनीने नकळत आम्हाला आजी आजोबांचा अनोखा अनुभव दिला. प्रसादने आमच्या नवीन फ्लॅटचे इलेक्ट्रिकचे कामही त्या काळात निगुतीने पार पाडले.  ह्या काळात आम्ही जसे जमेल तसे रोज नवीन फ्लॅटमधले सामान लावून घेतले आणि विकसकाकडून ताबा मिळण्याची वाट पाहत होतो, जो आम्हाला दिवाळीच्या आधी मिळाला.


अर्थात हे सर्व विधीलिखित आहे असेच मला जाणवते. आपण निमित्तमात्र असतो बाकी काही नाही. आपली नीतीमत्ता चांगली असेल तर हे असे अविस्मरणीय अनुभव नक्कीच येतात. त्यामुळेच की काय नवीन घरात आम्ही पहिलीच दिवाळी अतिशय उत्साहाने साजरी केली. हे सर्व शंकर महाराजांच्या, स्वामी समर्थांच्या आणि आमच्या पूर्वजांच्या आशीर्वादाने होत आहे हे नक्की. वंदनाचा 61वा वाढदिवस आम्ही आमच्या नवीन घरात साजरा केला आणि मी तिला त्या दिवशी फ्लॅटच्या किल्ल्या भेट दिल्या. आम्हा दोघांच्या कष्टाचे चीज झाले होते. हे नवे घर बायकोला भेट देताना तिने मोठ्या विश्वासाने माझ्यावर टाकलेल्या एका फार मोठ्या जबाबदारीतून मुक्त झाल्याची भावना दाटून आली होती. एका डोळ्यात गुरुसदनच्या विरहाचे अश्रू होते आणि दुजा डोळ्यात नवीन घरात प्रवेशाचे आनंदाश्रू होते.


आमच्या ह्या संकल्पास मूर्त स्वरूप देणाऱ्या गुरुसदनच्या ऋणात तहहयात राहण्याचा निश्चय करून आम्ही वंदनाच्या आईबाबांची माफी मागायला विसरलो नाही. एवढा सगळा संघर्ष तसेच हा द्राविडी प्राणायाम शब्दबद्ध करणे ही सुद्धा तारेवरची कसरत होती. भावनांचे प्रतिबिंब, तरंग मनाचे होऊन, माझ्या ओंजळीतून कागदावर उमटण्यासाठी ओसंडून वाहत होते व आमच्या अनोख्या रेशीमगाठींना हेलावून गेले होते.


हा सगळा थक्क करणारा प्रवास तुम्हा वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रांजळ उद्देश असा की, आपल्या प्रत्येकाच्या कथा आणि व्यथा ह्या वेगळ्या असतात.  दुसऱ्यांच्या अनुभवातून चांगले काही असेल तर ते टिपायचे व त्यावरून आपल्या गरजेनुसार बदल करून आपल्या सोयीनुसार त्याचा उपयोग करून घ्यायचा. वावगे काही असेल तर ते अव्हेरुन त्यातून जमेल तसे शिकायचे असते.  शेवटी, ‌‘ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे‌’, हेच काय ते खरे!


वृद्धापकाळाच्या प्रवेशद्वारावर उभा असताना मी आजवरचा सर्व अनुभव पणाला लावला होता. संयमाने, सचोटीने, निष्ठेने आणि प्रामाणिकपणे एक एक निर्णय तावून सलाखून घेत गेलो आणि महाराजांनी आमच्या झोळीत अपेक्षित यश टाकून आम्हाला कृतकृत्य केले आहे असे म्हणालो तर वावगे होणार नाही.


एक गोष्ट अगदी निक्षून जाणवली ती म्हणजे लग्नानंतर आपल्या जोडीदारावर ठेवलेला विश्वास आपल्याला योग्य मार्गावरच नेतो व ज्याचा शेवटही चांगलाच होतो.साधारण एक-दोन वर्षे मी आणि बायको (वंदना) काही दिवस रोज एकाच विषयावर नियमितपणे चर्चा करायचो, की आपण आपलं धनकवडी येथील राहतं घर नव्हे वास्तू (गुरुसदन) विकून सहकारनगर भागात 2 किंवा 3 बेडरूमचा फ्लॅट घेऊ! त्याला कारणही तसेच होते. पूर्वाचे मंदारबरोबर लग्न होऊन ती तिच्या घरी बिबवेवाडीला राहायला गेली होती.  


अंदाजे 30-35 वर्षे फक्त आमच्या शेजारी राहणारी नव्हे तर आमची जिवाभावाची जोगळेकर आणि पटवर्धन ही दोन कुटुंबे तुळशीबागवाले कॉलनी, सहकारनगर नंबर 2 येथे वर्ष झाले राहायला गेले होते. तेव्हापासून मी बायकोच्या पाठीमागे नुसता धोषाच लावला होता की आपणही जाऊ सहकारनगर येथे राहायला! आम्हाला धनकवडी येथे अजिबात करमत नव्हते. बंगल्यांची सोसायटी असल्यामुळे गरज पडेल तेव्हा संवाद होत होता पण तोही थोडा विरळच.  विरंगुळा म्हणून तळजाईला रोज चालायला जाणे मात्र चालूच होते. अधुनमधून बावधनला ‌‘चपराक‌’च्या कार्यालयात जाणे होत असे परंतु धनकवडीहून हे अंतर फार असल्यामुळे माझे जाणे तसे अगदीच कमी झाले होते.


त्यात आताशा आम्हाला खूप एकटे पडल्याची भावना मनात सारखी दाटून येत होती. आम्हा दोघांची नुकतीच साठी उलटून गेल्यामुळे व माझ्या तब्येतीच्या तक्रारींमुळे मला फारशी दगदग होत नव्हती. त्यात धनकवडीत वाहतुकीचा बोजवारा उडाल्यामुळे बाहेर कुठेही जाण्यासाठी फारच दमछाक होत होती.


आमची अडचण एकच होती, की आम्ही दोघेही स्वेच्छानिवृत्ती घेऊन घरी बसलो होतो व जमेल तसे आपापले छंद, आवडी निवडी जपत होतो. त्यात मला तर मुळात काहीच अर्थार्जन नव्हते. एलआयसीची जेमतेम दरमहा रुपये 3200/- पेन्शन होती. वंदनाला दरमहा आमचे दोघांचे भागेल अशी पेन्शन मिळत होती. मुळात स्वेच्छानिवृत्ती घेतल्यापासून आम्ही आमच्या गरजा इतक्या कमी केल्या होत्या की आम्हाला महिन्याला 15 ते 20 हजार रुपये, अगदी औषधांच्या खर्चासहित व्यवस्थित पुरत होते.


या पार्श्वभूमीवर इच्छा असूनही सहकारनगर येथे नवीन फ्लॅट घेण्याच्या दृष्टीने आमचे आर्थिक गणित अगदीच तुटपुंजे होते.  नव्हे कुठल्याही विचाराने ते आमच्या आवाक्याच्या बाहेरचे होते. मला तर ते स्वप्नवतच वाटत होते परंतु माझ्या डोक्यातील नवीन फ्लॅटचे खूळ काही केल्या जात नव्हते. त्याला कारणेही तशीच वैयक्तिक, वैद्यकीय, भावनिक, व्यावहारिक, सामाजिक आणि प्रायोगिक होती. ते म्हणतात ना, तुमची इच्छा प्रबळ असेल तर मार्ग आपोआपच निघतात. त्यासाठी नुसते नशिबावर अवलंबून राहून चालत नाही हेही तितकेच खरे आहे! प्रयत्ने वाळूचे कण रगडीता, तेलही गळे, ही प्रचलित म्हण आमच्या बाबतीत अगदी तंतोतंत लागू पडली.


मुळात आमचे राहते घर नव्हे तर आमची अत्यंत लाडकी वास्तू म्हणजे आमचे ‌‘गुरुसदन‌’. माझे सासू-सासरे (वंदनाचे आई वडील) यांनी स्वकष्टाने आणि जिकीरीने अतिशय कठीण परिस्थितीवर मात करून बांधले होते. त्यांच्या वयाच्या साठीत त्यांनी, स्वाती सोसायटीमधील 2 गुंठ्याचा प्लॉट 1972 साली 999 वर्षाच्या भाडेकरारपट्ट्याने घेतला होता. त्यावर ढोरमेहनतीने चार खोल्यांचे अतिशय टुमदार असे घर बांधले होते. त्याच्या आजूबाजूला सुंदरशी बाग फुलवली होती. 1978 साली त्यांच्या आयुष्याचे हे स्वप्न पूर्ण झाले. त्यामध्ये त्यांची एकुलती एक मुलगी वंदनासोबत गुरुसदनात ते राहायला आले. त्यानंतर माझे आणि वंदनाचे 1987 साली लग्न झाले. काळाची गरज आणि आमच्यावरील जबाबदारीच्या जाणिवेने आम्ही ‌‘गुरुसदन‌’मध्येच आमचा संसार थाटला होता. (यामागेही फार मोठा इतिहास आहे, जो या लेखाचा विषय नाही म्हणून लिहित नाही.)  


आमच्या सुखी संसारात आमच्या कन्यारत्नाचे आगमन झाले आणि आमचे विश्वच बदलून गेले. पूर्वागमनामुळे हळूहळू आमची आर्थिक परिस्थिती सुधारत गेली. आम्ही जसे जमेल तसे गुरुसदनचा कायापालट करत गेलो. अगदी एकदा सोडून दोनदा गुरुसदनची वास्तुशांत केली होती. सर्व नातेवाईक, आप्तेष्ट, मित्रमंडळींचे आदरतिथ्य गुरुसदनने केले आहे.  आमच्या इतकीच गुरुसदन ही सर्वांच्या जिव्हाळ्याची वास्तू होती, हे मात्र तिचे खास वैशिष्ट्य होते. कधीही कोणाला गुरूसदनने परके मानले नाही. इतका तिच्यात सकारात्मकतेचा, आपलेपणाचा व जिव्हाळ्याचा भाव होता. येणाऱ्या प्रत्येकाला गुरूसदनमध्ये पाऊल ठेवले की एक प्रकारची सात्त्विक ऊर्जा जाणवायची. म्हणूनच तर ते आमचे सर्वांचे गुरुसदन होते.  


गुरुसदनच्या कणाकणात, क्षणाक्षणात, वातावरणात, झाडांच्या पानांत, पक्ष्यांच्या किलबिलाटात, फन्टूश ह्या आमच्या श्वानाच्या आठवणीत, अनेक मांजराचे हक्काच्या असलेल्या घरात, अनंत स्मृती जतन करून ठेवलेल्या आहेत की काही विचारू नका!  खूप साऱ्या अविस्मरणीय अशा क्षणांची सोनेरी खाण म्हणजे आमचे गुरुसदन. नियतीने जिव्हारी लागणारे घाव घालून, काळाच्या खलबत्त्यात कुटून सुद्धा, त्यातून तावून सुलाखून अलगद बाहेर काढलेलेही खूप प्रसंग आमच्या ह्या गुरुसदनने आणि आम्ही अनुभवले आहेत. गुरुसदनचे आणि आमचे काय, कसे, किती घट्ट ऋणानुबंध असतील ह्याचा विचारच न केलेला बरा! भावनांचा बांध फुटला तर प्रलय निश्चित आहे, त्यामुळेच त्याला आवरही घालावा लागतो, हे तुम्ही समजू शकता.


इतका वेळ मी गुरुसदनविषयी भूतकाळात बोलतो आहे, त्याचे कारणही तसेच आहे. अतिशय जड अंत:करणाने सांगावे लागते आहे की, तुळशीबागवाले कॉलनी सहकारनगर नंबर 2 येथील नवीन फ्लॅट घेण्यासाठीचे आर्थिक पाठबळ आमच्याकडे नसल्यामुळे व काळाची गरज म्हणून सरतेशेवटी आम्हाला आमची लाडकी आणि अतिशय प्रिय अशी ही वास्तू गुरूसदन विकावी लागली व त्या अर्थाजनातून नवीन फ्लॅट विकत घ्यावा लागला.


आमच्यासाठी हा अतिशय कठीण व जोखमीचा निर्णय होता. माझ्यासाठी तर होताच होता परंतु वंदनासाठीही, जिच्या आईबाबांची ही वास्तूच एकमेव आठवण होती. तिने अक्षरशः काळजावर दगड ठेऊन ‌‘गुरुसदन‌’ विकण्याचा निर्णय घेऊन मला नवीन फ्लॅट घेण्यासाठीची अनमोल अशी मदत केली आहे.  आम्ही दोघांनी अहोरात्र कष्ट करून आमची ही वास्तू जतन केली होती, तिच्यात आमच्या गरजेनुसार कायापालट केला होता. अर्थात, आमच्या वृद्धापकाळात लागणाऱ्या सर्व सुखसोयी सुद्धा करून घेतल्या होत्या परंतु एकाकीपणा, नसलेला शेजार, वृद्धापकाळाची लागलेली चाहूल आणि त्यानंतर येऊ घातलेल्या समस्या, इच्छा असूनही विरळ होत चाललेले आधाराचे हात आणि भविष्यात आमचे शरीर थकल्यानंतर न घेता येणाऱ्या घराच्या जपणुकीच्या व देखभालीच्या काळजीपोटी आम्हाला दिवसेंदिवस चिंताजनक वाटू लागली होती.


अर्थात ह्या निर्णयास येण्या अगोदरही पूर्वा, मंदार आणि मंदारच्या आईशी सविस्तर चर्चा करून विचारांचे आदानप्रदान करत होतो. भविष्यात येणाऱ्या परिस्थितीचे आकलन करत होतो.  त्यावर तोडगा कसा आणि काय काढायचा ह्यावर बराच खल आम्ही सर्व जण जवळजवळ एक दीड वर्ष करत होतो.


आमच्यासाठी गुरुसदन विकून नवीन फ्लॅट घेणे म्हणजे आपल्या स्वार्थासाठी पोटच्या पोराला पाण्यात पायाखाली टाकून स्वतःचा जीव वाचवल्यागत वाटत होते. (इथे मला माकडिणीची कथा आठवत होती). असो.


आम्हालाही पूर्वा हेच एकमेव अपत्य. आमची जी काही मिळकत आहे तिच्यावर तिचाच अधिकार आहे. तो सुद्धा आम्हाला आमच्या हयातीत तिला सुपूर्त करायचा होता. आमची तशी एक प्रांजळ भावना होती. इथे आमचा नटसम्राट तर होणार नाही याची खातरी केलेली होती कारण आमची पोरं खूपच सद्गुणी आहेत हे मात्र नक्की. आमच्या सदसद्विवेक बुद्धिचा आणि भावनांचा योग्य आदर करूनच जो काही असेल तो निर्णय घ्यायचा असे ठरवले होते. ह्यासाठी माझी बायको वंदना हिचा मला फार हेवा वाटतो. तिने गेले 37 वर्षे माझ्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला आहे आणि तो ह्या निर्णयातही कायम होता हे विशेष आहे.


आम्ही सर्व बाबींची पडताळणी करून पाहत होतो. काही मित्रमंडळी आणि नातेवाईकांशी चर्चा करत होतो. पहिल्यांदा आम्हाला संमिश्र प्रतिक्रिया येत होत्या. इतके सुंदर बैठे घर अथवा बंगला विकून फ्लॅट घेणे म्हणजे शुद्ध मूर्खपणा आहे,  इतपत आमच्यावर शेरेबाजी केली गेली होती. अर्थात ती आमच्यावरील प्रेमापोटी होती असे समजून आम्ही पुढे जात होतो. त्यातही मी काही जवळच्या लोकांशी घर घेण्याबाबत  विचारणा करत होतो परंतु बऱ्याच लोकांचे आर्थिक गणित जमून येत नव्हते.  


त्यात पूर्वा आणि मंदारने भविष्यात ‌‘गुरूसदन‌’ची काळजी घेण्यास असमर्थता व्यक्त केली होती. त्यामागे त्यांची कारणेही अगदी योग्यच होती. मुळात आपली भावनिक मोलाची वास्तू जरी असली तरी तिचे भौगोलिक स्थान त्यांच्यासाठी फारच अयोग्य होते आणि भविष्यात ते ह्या वास्तूचा कितपत वापर करू शकतील अशी शंका व्यक्त करत होते. उत्पन्नाचे साधन म्हणून जरी पाहिले तरी त्यांच्या दृष्टीने ते फारच जिकीरीचे आणि जोखीमीचे होते व त्यांच्या भविष्याच्या दृष्टीने ते बरोबरही होते.


हे सर्व एकाबाजूला चालू असताना पूर्वा आणि मंदारने सहकारनगर येथे 3 बेडरूमचा फ्लॅट बुक करून ठेवला होता, जो साधारण 2 वर्षांनी ताब्यात येणार होता. त्यामागे त्यांचे आर्थिक नियोजन होते व ते अगदी योग्यही होते परंतु नंतर तेही नियोजन थोडेसे बदलले गेले. तसे पाहिले तर राहता बंगला विकून फ्लॅटमध्ये राहायला जाणे म्हणजे प्रगतीकडून अधोगतीकडे जाण्यासारखे होते. अर्थात प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोन हा वेगळा असतो. अर्धा रिकामा ग्लास, त्याच्याकडे बघताना काही लोक अर्धा भरलेला आहे म्हणतात तर काही अर्धा रिकामा असे म्हणतात. असो.


सकारात्मक दृष्टीने पाहिले तर या जगात अशक्य असे काहीच नाही त्यामुळेच आमच्या इच्छाशक्तिमुळेच आम्ही हा अतिशय अवघड, जिकीरीचा, जोखमीचा व तितकाच संवेदनशील आणि भावनेने ओथंबून वाहणाऱ्या विचारांचा ताळमेळ घालून आमच्या मनाला पटणारा निर्णय घेतला होता. संवेदनशील माणसाच्या आयुष्यामध्ये जेव्हा निर्णय घ्यायची वेळ येते आणि तेव्हा तो खरोखरच न डगमगता निर्णय घेत असेल तर त्याच्यामागे नियती, त्याचे नशीब आणि परिवार अथवा कुटुंब नक्कीच उभे राहते हे आमच्या या अनुभवाने सिद्ध होते. मध्यंतरी मंदार आणि पूर्वाच्या संसारात थोडा कठीण काळ दारावर येऊन ठेपला होता. पोरांची सत्त्वपरीक्षाच पाहण्याचे नियतीने ठरवले होते. त्यांच्या आयुष्यात जी काही स्थित्यंतरे येत होती, ती पाहून आमचे मन थोडे विषण्ण होत होते. आमच्याही आयुष्यावर ज्याचा कितीही नाही म्हटले तरी परिणाम होत होता. शेवटी लग्न म्हणजे दोन परिवार एकत्र येऊन आपली सुख-दु:खे एकमेकांशी वाटत असतात. तसेच काहीसे आमच्याही बाबतीत घडत होते. आमच्या एकुलत्या एक मुलीच्या सांसारिक आयुष्यातील हा अजून एक अवघड टप्पा ती पार करताना आमच्याही जिवाची घालमेल होत होती. एकमेकांपासून दूर राहून काहीच करता येत नव्हते आणि तसे करणे शारीरिकदृष्टीने मनात असूनही शक्य होत नव्हते. आज त्यांना आधाराची गरज आहे, उद्या आपल्याला त्यांच्या आधाराची गरज भासणार आहे हे प्रकर्षाने जाणवत होते. नियती वयपरत्वे आता आमच्यातील सहनशक्तिचा अंत पाहत होती असे म्हणालो तर अतिशयोक्ती होणार नाही.


ह्या सर्व कठीण परिस्थितीत एक जमेची बाजू म्हणजे, पूर्वा आणि मंदारचे एकमेकांवरील प्रेम, विश्वास आणि त्यांची अनुभवातून आलेली परिपक्वता हे होय. नियतीच्या इतक्या निष्ठुर परिस्थितीतही ही पोरं एकमेकांच्या साथीत मजबूतपणे उभी होती आणि तीच त्यांच्या सुखी संसाराची कधीही न हलणारी एकदम मजबूत अशी पायाभरणी होती असे मला अगदी प्रामाणिकपणे जाणवले.


मंडळी, थोडे विषयांतर झाले असे तुम्हाला वाटले असेल परंतु तसे काही नाही. भावनांच्या ह्या विश्वाला अनंत कंगोरे असतात आणि हेच ते कंगोरे एक एक करून उलगडत जायचे असते, त्यालाच तर आपण आयुष्य म्हणतो. ‌‘दुःख सांगितल्याने कमी होते आणि सुख वाटल्याने वाढते‌’, असे म्हणतात म्हणूनच हा सगळा खटाटोप आहे. दुसऱ्याच्या अनुभवावरून आपण काही तरी घ्यायचे आणि त्यातून शिकायचे व आपले आयुष्य समृद्ध करायचे ह्यातच खरी गमंत आहे. म्हणूनच तर हा लेखप्रपंच!


तर त्याचे असे झाले, की सरते शेवटी सर्व बाबींचा उहापोह करून, जर-तरचा विचार करून, चांगल्या-वाईटाची चर्चा करून, हवे-नको त्याची सांगड घालून, भूतकाळाच्या अनुभवातून घडवलेल्या वर्तमानाचा विचार करत करत, भविष्याची तजवीज म्हणून केलेल्या चुकांची उजळणी करत, आपल्यातील दुर्गुणांचा अभ्यास करून, गुणांचा लेखाजोखा समोर ठेवत, आपल्यामधील कमकुवत बाजूंचा अथवा उणीवांचा आढावा घेत, कुटुंबातील सदस्यांच्या प्राबल्याचा विचार करत करत, तुझे नको, माझे नको असे म्हणत सर्व अहंकार आणि अतिविश्वासावर मात करत, स्वत:मधील सामर्थ्याचा व कौटुंबिक एकजुटीचा जो काही निर्णय होईल तो घ्यायचे ठरवले आणि तो जो काही येईल त्याची सर्वार्थाने अंमलबजावणी करायची हे नक्की करून आम्ही आमचे ‌‘गुरुसदन‌’ विकून आमच्यासाठी सहकारनगर येथे 2 बेडरूम फ्लॅट घ्यायचे ठरवले.


तसेच पूर्वा आणि मंदारनेही 3 बेडरूम फ्लॅटचा हट्ट बाजूला ठेवून त्यांनीही 2 बेडरूमचा फ्लॅट घेण्याचे निश्चित केले. अर्थात ह्याला एकच अतिशय महत्त्वाची बाजू आम्ही विचार केली होती, ती म्हणजे शक्यतो हे दोन्ही फ्लॅट शेजारी शेजारी हवेत.  म्हणजे भविष्यात आमच्या पोरांना मोठ्या घराची गरज भासली तर दोन्ही फ्लॅट एकत्र करता येऊ शकतील आणि आमच्या दोन्ही परिवारांना एकमेकांचा आधारही मिळेल.  एकमेकांसाठीचा आधार हीच तर ह्या सर्व निर्णय प्रक्रियेतील जमेची आणि उजवी बाजू होती असे म्हणालो तर वावगे ठरणार नाही. तसेच भविष्यात गरज पडली तर एक फ्लॅट भाड्याने देऊन त्यातून उत्पन्नाचे एक साधन म्हणूनही विचार करून ठेवला होता. पोरांच्या माहिती तंत्रज्ञान व्यवस्थेमधील नोकऱ्या असल्यामुळे अगदीच नाईलाज झाला तरचा हा उपाय योजला होता. वेळ काही सांगून येत नसते. त्यानुसार भविष्याची थोडी तजवीज केलेली केव्हाही बरी, हा मी माझ्या अभ्यासातून आणि अनुभवातून आलेला विचार प्रत्यक्षात आणला होता, एवढेच काय ते त्याचे महत्त्व.


एक सांगतो, नियती काही एवढीही वाईट नसते. आमच्या मनात गेले दीड-दोन वर्षे चाललेले द्वंद्व तिने पाहिले होते आणि तिनेच त्यावर उपाय शोधून ठेवलेला होता, फक्त तो आमच्यापर्यंत तिने तो पोहोचवला नव्हता म्हणा किंवा ती आमची सत्त्वपरीक्षा पाहत होती असे मला वाटते. मुलांच्या आयुष्याच्या दृष्टीने त्यांचा निर्णय अगदी योग्य होता परंतु आमच्या वयाचा विचार करता, निवृत्तीनंतर म्हणजे साठीनंतरच्या आयुष्यात पुन्हा परत एकदा सगळ्याच बाबतीत आम्हाला नव्याने सुरुवात करायला भाग पाडणारी ही सगळी प्रक्रिया होती. अगदी आधार कार्ड, पॅनकार्ड, बँकांचे व्यवहार, ड्रायव्हिंग लायसेन्स, गाडीच्या कागदपत्रांवरील, पासपोर्टवरील पत्ते इत्यादी, इत्यादी. ह्याचा नंतर शांतपणे विचार केल्यावर आपल्याला हे सगळे झेपेल का? आणि जमेल का? असे काही क्षण वाटले पण एकदा निर्णय घेतला की तो परत फिरवायचा नाही असा निर्धार केल्यामुळे गुरुसदनचा विरह सहन करावा लागला. तत्कालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी गुरुसदनचा त्याग करणे आमच्यासाठी खूप गरजेचे होते आणि ह्या प्रक्रियेमध्ये आपण निर्जीव समजत असलेल्या दगड, वाळू, सिमेंटच्या वास्तूनेही, सजीव होऊन आमच्या संकल्पास फार अनमोल अशी साथ दिली आहे, हे विसरलो तर ती कृतघ्नता होईल. आमच्या आयुष्यातील गुरुसदनचे भावनिक स्थान कदापि ढळणार नाही हे निश्चित आहे.


वर म्हटल्याप्रमाणे नियतीने साथ दिली आणि बहीण अश्विनीच्या ओळखीने आम्हाला सहकारनगरमध्ये नुकतेच बांधून तयार असलेले पाचव्या मजल्यावरील शेजारी शेजारी असलेले 2 बेडरूमचे 2 फ्लॅट बघायला मिळाले. नियतीने हे फ्लॅट आमच्यासाठीच तयार ठेवले होते की काय असे वाटले. अजिबात वेळ न दवडता आणि आधी केलेल्या सर्व चर्चा चर्वितचर्वणाचा परिपाक म्हणून एका रात्रीत आम्ही हे दोन्ही फ्लॅट विकत घेण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्याच दिवशी आम्ही विकसकाच्या कार्यालयात जाऊन आगाऊ रक्कम भरूनही आलो हे विशेष नमूद करतो आहे. विकसकाने आम्हाला उरलेले पैसे भरण्यासाठी फक्त 60 दिवसांची मुदत दिली होती, जी मला प्रथमतः फारच मुश्किल वाटली होती परंतु जीव तोडून प्रयत्न केला तर साध्य करणे अवघडही वाटत नव्हते. इथे माझ्या आत्मविश्वासाचा आणि आयुष्यातील चांगल्या-वाईट अनुभवाचा कस लागणार होता. जो की मला तारणार तरी होता किंवा मारणार तरी होता.  आयुष्याचा फार मोठा जुगार मी खेळतो आहे, ज्यात मला जिंकण्याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय नव्हता, हे इथे खास नमूद करावेसे वाटते. अशा वेळेस आपल्या श्रद्धास्थानास आठवावे, त्यापुढे नतमस्तक व्हावे. म्हणजे आपले सर्व प्रश्न चुटकीसरशी सुटतात हे नक्की. हो पण त्यासाठी आपण इमानदार असायला हवे बरं का!  


ह्या भावनेच्या खेळात माझी अवस्था चक्रव्यूहात अडकलेल्या अभिमन्यूसारखी झाली होती पण माझ्या मागे माझ्या पूर्वजांची पुण्याई, माझी नीतिमत्ता, सचोटी, प्रामाणिकता, कुटुंबाप्रतीची आस्था, प्रेम, गुरुसदनवरची निष्ठा आणि शंकर महाराज व स्वामी समर्थांचे आशीर्वाद होते, जे मला यशस्वी करण्यासाठी सज्ज होते व तसे त्यांनी केलेही. पूर्वा आणि मंदारसाठी कर्जाचा पर्याय उपलब्ध होता, त्यामुळे त्यांना त्यांच्या फ्लॅटसाठीचे पैसे उभे करण्यास फारशी अडचण नव्हती. प्रश्न माझा आणि वंदनाचा होता.  आता आमच्यासमोर गुरुसदन विकण्याशिवाय पर्यायच नव्हता आणि जो आम्ही फ्लॅट बुक करतानाच मनाशी पक्का विचार करून नंतरच आगाऊ रक्कम देऊन आलो होतो. तरीही आमच्या फ्लॅटची रक्कम खूपच मोठी होती. आयुष्याची सर्व कमाई आणि गुरुसदन विकून येणारी रक्कम एकत्र करून हे सगळे कसेबसे जमवायचे होते, ते कळत नव्हते. हीच तर खरी आमच्यासाठी तारेवरची कसरत होती. अगदी प्रांजळपणे सांगतो, सहकारनगरमध्ये फ्लॅट घेण्याचे स्वप्न पाहणारा मी जेव्हा विकसकाच्या कार्यालयात बसलो होतो आणि फ्लॅटच्या किमतीवरून चर्चा करत होतो तेव्हा थोडा हबकलोच होतो. फ्लॅटची किंमत ऐकून थोडा वेळ डगमगायला झाले पण मनाशी एक खूणगाठ बांधली होती की आता काही झाले तरी मागे हटायचे नाही. जे होईल ते पाहू. सरतेशेवटी शंकर महाराज आणि स्वामी समर्थ आहेतच की आपल्या पाठीशी! आणि खरंच महाराज आमच्या सदैव पाठीशी उभे होते ते पदोपदी जाणवत होते.


सर्वसाधारणपणे दोन बेडरूमचे दोन फ्लॅट सहकारनगरमध्ये आणि गुरुसदनची विक्री असे एकूण तीन व्यवहार केवळ 60 दिवसांत पार पाडायचे शिवधनुष्य आम्ही चौघांनी उचलले होते व ते अगदी आलेल्या सर्व अडचणींवर (त्याची यादी खूप मोठी आहे, त्यावर वेगळा लेख होईल) लीलया मात करून पेलवले होते हेही तितकेच खरे आहे.


मंडळी, विकसकाला आगाऊ रक्कम देऊन आल्यावर, गुरुसदनच्या विक्रीसाठी मित्र मंडळी, नातेवाईक वगैरेंशी चर्चा करताना एक जाणवले की गुरुसदनचा व्यवहार फारच मोठा होता आणि तो मला अपेक्षित असलेल्या किमतीत तसेच एका रक्कमेत पूर्ण करणाऱ्या गृहस्थाची (गिऱ्हाईक नाही म्हणणार) अथवा कुटुंबाची गरज होती. माझी तीच तर एकमेव अट होती. तसे मी स्वाती सोसायटीच्या चेअरमन यास सांगून ठेवले होते.  सोसायटीमधील दोन प्रथितयश सदस्यांशी सल्लामसलतही केलेली होती. काही बाबतीत आपल्याला जर फारसे ज्ञान व अनुभवही नसेल तर योग्य व्यक्तिचे मार्गदर्शन व सल्ला घेतलेला बरा, हे न सांगितलेले बरे! त्यांच्या सल्ल्याचा मला पुढे खूपच चांगला फायदा झाला हे मात्र नक्की.


गुरुसदन विकण्याच्या दृष्टीने माझी हालचाल सुरु झाली.  काही इस्टेट एजन्टपर्यंत ही बातमी गेली आणि रोज 3 ते 4 मंडळी घर बघायला येत होती. हा प्रवास जवळजवळ पुढील 40-45 दिवस न थकता चालू होता. माझ्या आयुष्यातील एवढ्या मोठ्या व्यवहाराची ही पहिलीच वेळ होती, जशी पहिल्या बाळंतपणात बाईची घाबरगुंडी उडते अगदी तशीच माझी गाळण उडाली होती. इतके विचित्र लोक घर पाहायला येत होते की काही विचारू नका. मी जर पु. ल. देशपांडे असतो तर त्यावर दोन तीन तरी कथा केल्या असत्या आणि पंधरा वीस व्यक्तिचित्रणे लिहिली असती.


एक तर आमचे गुरुसदन हे दोन मजली होते. त्यात घरात इतक्या सोयीसुविधा करून घेतल्या होत्या की त्या प्रत्येक वेळेस आलेल्या प्रत्येक गिऱ्हाईकास (इथे गिऱ्हाईक हाच शब्द योग्य आहे म्हणून वापरला आहे) पटवून देता देता माझी पुरती वाट लागत होती. घशाला कोरड पडत होती आणि जिने चढउतार करून पायाचे तुकडे पडत होते. त्यात रोज भावनांचा अक्षरशः चुराडा होत होता. येणारी गिऱ्हाईके एक बंगला म्हणून बघत होती आणि त्यांच्या कुवतीने त्याची किंमत करत होती. त्यात त्यांचे काहीच चुकत नव्हते पण हे सर्व हाताळताना माझ्या मात्र पोटात गोळाच यायचा. दरवेळेस मन खंबीर करून आलेल्या लोकांना आम्ही दोघे सामोरे कसे जात होतो, ते आमचे आम्हालाच माहीत.


सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की आम्ही सर्व फर्निचर सहीत गुरुसदन विकले आहे कारण माझ्यासमोर दुसरा पर्यायच नव्हता. साधारण 4 बेडरूमचे हे घर, त्यात भिंतीमधील कपाटे, 6 फुटांचे लाकडी बेड अगदी गादीसहित, जे फ्लॅटमध्ये मावणे शक्यच नव्हते आणि त्याला सामान ठेवायची सोय नसल्यामुळे ते तिथेच सोडून देणे मला योग्य वाटले. तसेच गुरुसदनला चांगली किंमत यावी ह्या उद्देशाने मी अक्वॉगार्ड, गॅसवरील चिमणी, पंखे, किचनमधील कपाटे इत्यादी हे सर्व त्या किमतीत वर्ग करत होतो. जेणेकरून मला सहकारनगरमधील फ्लॅट घेताना कुठलीही अडचण येऊ नये हा त्यामागील उद्देश होता हो.


माझ्या उभ्या आयुष्यात मी खूप मार्केटिंग केले होते परंतु स्वतःचे घर विकताना कराव्या लागलेल्या मार्केटिंगने माझ्या तोंडाला अक्षरशः फेस आणला होता. एवढी मेहनत करून जवळ जवळ 40 दिवस सकारात्मक असे काही घडतच नव्हते.  एजंटांचा नुसता सुळसुळाट होता. व्यवहाराची रक्कम मोठी असल्यामुळे त्यांचे अथक प्रयत्न माझा जीव मात्र मेटाकुटीला आणत होते. त्यात त्यांना दोष देण्यास काहीच अर्थ नव्हता. कारण घर योग्य किमतीस, लवकरात लवकर, योग्य कुटुंबास, विकणे ही माझी गरज जास्त महत्त्वाची होती.


जी काही माणसे अथवा कुटुंबे घर पाहायला येत होते, त्यांचा आम्हाला पहिला प्रश्न असायचा की, ‌‘तुम्ही एवढा चांगला आणि सुस्थितीतील बंगला कशासाठी विकता आहात?”  त्यांच्या ह्या प्रश्नाला काय उत्तर द्यावे हेच कळत नव्हते. “हे घर विकून आम्हाला सहकारनगर येथे 2 बेडरूमचा फ्लॅट घ्यायचा आहे” असे सांगितल्यावर तर काही जणांनी आम्हाला वेड्यातच काढले होते. अर्थात त्यात त्यांची काहीच चूक नव्हती. ते त्यांच्या जागी अगदी योग्य होते व आमच्याच बाजूने प्रांजळपणे विचार करत होते परंतु जेव्हा त्यांना नाण्याची दुसरी बाजू कळली, जी की आम्ही आणि आमची मुलगी दोघेही शेजारी शेजारी फ्लॅट घेणार आहोत म्हणून आम्ही हा बंगला विकून आमच्यासाठी एक फ्लॅट घेत आहोत व मुलगी आणि जावई कर्ज काढून त्यांच्यासाठी शेजारचा फ्लॅट घेणार आहेत! तेव्हा कुठे लोकांचा आमच्यावर विश्वास बसू लागला.


तरी ह्या व्यवहारात येणारी सर्वात मोठी अडचण म्हणजे, मी सांगितलेल्या किमतीला फारसे कोणी तयार होईनात. जवळ जवळ 15 एक जणांनी घर पाहूनही व्यवहार काही होत नव्हता.  पुढे जाणारा एक एक दिवस माझ्यासाठी हिमालयासारखा भासत होता कारण विकसकाने मला दोनच महिन्यांचा अवधी दिला होता. त्यातले 40 दिवस तर असेच काहीच न घडता फुकटात गेले होते. माझा तर संयम सुटत चालला होता. एक वेळ अशी आली होती की मी पोरांना सांगितले की, “तुम्ही तुमच्या फ्लॅटचा व्यवहार करून घ्या. आमचे आपण नंतर बघू. नाहीच जमले तर पुढे मागे जवळपास दुसऱ्या एखाद्या नवीन प्रकल्पात घेऊ आम्ही फ्लॅट.” हे बोलताना माझ्या काळजाला किती वेदना होत होत्या ते माझे मलाच माहीत. शब्द देऊन तो फिरवणारा हा शिवरायांचा मावळा नव्हे, असे मी सतत स्वत:ला समजावत होतो आणि आम्ही दोघे नवरा बायको येऊ घातलेल्या चांगल्या दिवसाची वाट पाहत होतो.


आमच्या जिवाची घालमेल, तळमळ, कळकळ आणि तगमग शंकर महाराज आणि स्वामी समर्थ देव्हाऱ्यातून पाहत होते आणि गालातल्या गालात हसत मनातल्या मनात म्हणत होते, कशी जिरवली एका माणसाची!  महाराज आमच्या ठाम निर्णयाची व त्या निर्णयामागील प्रामाणिक आणि निरागस भावनेची सत्त्वपरीक्षाच पाहत होते असे मला नंतर जाणवले.


आमचे गुरुसदन ह्या वास्तुवरील प्रेम नक्कीच निर्मळ व प्रांजळ होते व त्या वास्तूच्या आदरापोटीच आम्ही तिची पुढे आबाळ होऊ नये म्हणूनच योग्य व्यक्तिला सुपूर्त करून फार मोठ्या ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न करत होतो. हे त्यांना जाणवले व त्यानंतर त्यांनी आमच्या व्यवहारात येणारे सर्व अडथळे यथातथा दूर करून योग्य कुटुंबास आमच्या चेअरमनकरवी आमच्याकडे पाठवले.


मंडळी तुम्हाला आश्चर्य वाटेल आणि मी म्हणतो त्यावर विश्वासही बसेल. जोवर नियतीच्या मनात नसेल तर काहीच घडत नाही. तुमची श्रद्धा जर का स्वामींवर असेल आणि शंकर महाराजांवर असेल तर सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे घडतेच, फक्त तुम्हाला महाराजांच्या सत्त्वपरीक्षेत पास व्हावे लागते. मी शंकर महाराजांच्या मठात जाऊन आलो आणि माझ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मला मिळाले आणि आमच्या प्रांजळपणे पाहिलेल्या स्वप्नांची पूर्ती ही त्यांनीच घडवून आणली हे वेगळे सांगावयास नको.


50व्या दिवशी आमचा एका चांगल्या व योग्य कुटुंबाशी गुरुसदनचा व्यवहार झाला. कर्मधर्मसंयोगाने त्यांनी शब्द दिल्याप्रमाणे 8 दिवसांत संपूर्ण पैसे देऊन हा व्यवहार पूर्णही केला. चेअरमन साहेबांनी तर आमच्या व्यवहारात जातीने लक्ष घालून तो सर्व कागदपत्रांनिशी पूर्णही करून घेतला. हा व्यवहार पूर्ण झाल्यावर आम्ही बरोबर 60व्या दिवशी आमच्या विकसकास त्यांच्याशी ठरलेल्या रकमेचा व्यवहार पूर्ण करून एका महिन्यात आमच्या फ्लॅटचा ताबाही घेतला. पूर्वा आणि मंदारनेही त्यांच्या कर्जाचे सर्व सोपस्कार पूर्ण करून त्यांचाही व्यवहार पूर्ण करून फ्लॅटचा अंतर्गत सजावटीसाठीचा ताबाही घेतला.


आमच्या नवीन फ्लॅटचे अंतर्गत सजावटीचे काम जोगळेकरांच्या अमृताच्या कल्पकतेने आमच्या अपेक्षेच्याही पलीकडचे साकारले होते. त्यामुळे आमचा नवीन घरात राहायला येण्याचा उत्साह वाढण्यास मदत झाली हे नक्की. योगायोगाने माझे आराध्य दैवत गणपती बाप्पा यांचा गणेशोत्सव होता. त्यानिमित्ताने आम्ही नवीन फ्लॅटमध्ये सर्वप्रथम गणेशोत्सवात श्री गणेशाची मनोभावे प्राणप्रतिष्ठा केली. अर्थात आम्हाला विकसकाकडून राहण्यासाठीचा फ्लॅटचा ताबा मिळायला अजून महिनाभराचा अवधी लागणार होता. त्यात आम्हाला गुरुसदनचा ताबा द्यायचा होता. ह्या महिनाभरासाठी कुठे राहायचे आणि सामान कुठे ठेवायचे असा गहन प्रश्न समोर उभा ठाकला होता. प्रश्नातच त्याचे उत्तर दडलेले असते, आपण सचोटीने ते शोधायचे असते. महाराजांनी माझा मित्र नव्हे मोठा बंधू जयकुमार काकडे आणि त्याच्या परिवाराला ह्या प्रश्नाचे उत्तर म्हणून आमच्या मदतीला पाठविले होते.


आमचे सर्व सामान आम्ही पूर्वा-मंदारच्या फ्लॅटवर ठेवले आणि गुरुसदनचा ताबा देऊन काकडे काकांकडे जवळ जवळ दीड महिना अगदी हक्काने राहिलो. काकडे वहिनी आणि सून अल्पनाने आमची खूप काळजी घेतली. भरपूर जेवू खाऊ घातले. त्यात काकाच्या नातीने अवनीने नकळत आम्हाला आजी आजोबांचा अनोखा अनुभव दिला. प्रसादने आमच्या नवीन फ्लॅटचे इलेक्ट्रिकचे कामही त्या काळात निगुतीने पार पाडले.  ह्या काळात आम्ही जसे जमेल तसे रोज नवीन फ्लॅटमधले सामान लावून घेतले आणि विकसकाकडून ताबा मिळण्याची वाट पाहत होतो, जो आम्हाला दिवाळीच्या आधी मिळाला.


अर्थात हे सर्व विधीलिखित आहे असेच मला जाणवते. आपण निमित्तमात्र असतो बाकी काही नाही. आपली नीतीमत्ता चांगली असेल तर हे असे अविस्मरणीय अनुभव नक्कीच येतात. त्यामुळेच की काय नवीन घरात आम्ही पहिलीच दिवाळी अतिशय उत्साहाने साजरी केली. हे सर्व शंकर महाराजांच्या, स्वामी समर्थांच्या आणि आमच्या पूर्वजांच्या आशीर्वादाने होत आहे हे नक्की. वंदनाचा 61वा वाढदिवस आम्ही आमच्या नवीन घरात साजरा केला आणि मी तिला त्या दिवशी फ्लॅटच्या किल्ल्या भेट दिल्या. आम्हा दोघांच्या कष्टाचे चीज झाले होते. हे नवे घर बायकोला भेट देताना तिने मोठ्या विश्वासाने माझ्यावर टाकलेल्या एका फार मोठ्या जबाबदारीतून मुक्त झाल्याची भावना दाटून आली होती. एका डोळ्यात गुरुसदनच्या विरहाचे अश्रू होते आणि दुजा डोळ्यात नवीन घरात प्रवेशाचे आनंदाश्रू होते.


आमच्या ह्या संकल्पास मूर्त स्वरूप देणाऱ्या गुरुसदनच्या ऋणात तहहयात राहण्याचा निश्चय करून आम्ही वंदनाच्या आईबाबांची माफी मागायला विसरलो नाही. एवढा सगळा संघर्ष तसेच हा द्राविडी प्राणायाम शब्दबद्ध करणे ही सुद्धा तारेवरची कसरत होती. भावनांचे प्रतिबिंब, तरंग मनाचे होऊन, माझ्या ओंजळीतून कागदावर उमटण्यासाठी ओसंडून वाहत होते व आमच्या अनोख्या रेशीमगाठींना हेलावून गेले होते.


हा सगळा थक्क करणारा प्रवास तुम्हा वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रांजळ उद्देश असा की, आपल्या प्रत्येकाच्या कथा आणि व्यथा ह्या वेगळ्या असतात.  दुसऱ्यांच्या अनुभवातून चांगले काही असेल तर ते टिपायचे व त्यावरून आपल्या गरजेनुसार बदल करून आपल्या सोयीनुसार त्याचा उपयोग करून घ्यायचा. वावगे काही असेल तर ते अव्हेरुन त्यातून जमेल तसे शिकायचे असते.  शेवटी, ‌‘ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे‌’, हेच काय ते खरे!


वृद्धापकाळाच्या प्रवेशद्वारावर उभा असताना मी आजवरचा सर्व अनुभव पणाला लावला होता. संयमाने, सचोटीने, निष्ठेने आणि प्रामाणिकपणे एक एक निर्णय तावून सलाखून घेत गेलो आणि महाराजांनी आमच्या झोळीत अपेक्षित यश टाकून आम्हाला कृतकृत्य केले आहे असे म्हणालो तर वावगे होणार नाही.


एक गोष्ट अगदी निक्षून जाणवली ती म्हणजे लग्नानंतर आपल्या जोडीदारावर ठेवलेला विश्वास आपल्याला योग्य मार्गावरच नेतो व ज्याचा शेवटही चांगलाच होतो.


रवींद्र कामठे

9421218528

साहित्य चपराक मासिक जुलै २०२६



Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page